शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हजारो आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा खर्डीतच थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 21:58 IST

रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते.

शाम धुमाळ

ठाणे - महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा चौथा दिवस हा बिऱ्हाड मोर्चा नाशिक येथून मंगळवारी १३ जून रोजी गोल्फ क्लब मैदानातून निघाला होता. काल ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यावर या मोर्चेकरांनी मुंबई नाशिक महामार्गावर तीन ठिकाणी महामार्ग रोखून धरले होते. या दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काल संध्याकाळी हा बिऱ्हाड मोर्चा शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मुक्कामी होते.

आज पुन्हा सकाळपासून हा मोर्चा ठाण्याच्या दिशेने पुढे पायी निघाला होता या दरम्यान आज दुपारी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी खर्डी येथे मोर्चेकरांची भेट घेऊन मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. परंतु हा विषय आदिवासी विकास मंत्र्याशी निगडित असल्याने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व आदिवासी विकास चे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा केली या चर्चेत आज रात्री ८ वाजता मंत्री गावित यांच्या बंगल्यावर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ बोलवण्यात आले. रात्री 8 वाजता शिष्ट मंडळ मंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून अद्याप मंत्र्यांची भेट झाली नाही. 

दरम्यान ५ जणांचे शिष्टमंडळ मुबईकडे गेल्या नंतर बाकी मोर्चेकरी खर्डी जवळील हॉटेल प्रांजली येथे थांबवून ठेवले असून उपविभागीय पोलीस अधिकारी  मिलींद शिंदे, विकास नाईक,शहापूर  प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे, घनश्याम आढाव ,महामार्ग पोलीस अधिकारी राकेश डांगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर ,आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी  किल्लेदार ह्या आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह मोर्चेकरांसाठी अन्न,पाणी सुविधासाठी प्रयत्नशील होत्या.

रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते. विशेषतः त्यांनी स्वतः त्यांच्या बंगल्यावर ८ वाजता मोर्चकऱ्यांसोबत बैठक लावली होती परंतु मंत्र्यांनी रात्रीचे ९ वाजून गेले  तरी वेळ पाळाली नसल्याचे समजते