शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हजारो आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा खर्डीतच थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 21:58 IST

रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते.

शाम धुमाळ

ठाणे - महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा चौथा दिवस हा बिऱ्हाड मोर्चा नाशिक येथून मंगळवारी १३ जून रोजी गोल्फ क्लब मैदानातून निघाला होता. काल ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यावर या मोर्चेकरांनी मुंबई नाशिक महामार्गावर तीन ठिकाणी महामार्ग रोखून धरले होते. या दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काल संध्याकाळी हा बिऱ्हाड मोर्चा शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मुक्कामी होते.

आज पुन्हा सकाळपासून हा मोर्चा ठाण्याच्या दिशेने पुढे पायी निघाला होता या दरम्यान आज दुपारी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी खर्डी येथे मोर्चेकरांची भेट घेऊन मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. परंतु हा विषय आदिवासी विकास मंत्र्याशी निगडित असल्याने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व आदिवासी विकास चे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा केली या चर्चेत आज रात्री ८ वाजता मंत्री गावित यांच्या बंगल्यावर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ बोलवण्यात आले. रात्री 8 वाजता शिष्ट मंडळ मंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून अद्याप मंत्र्यांची भेट झाली नाही. 

दरम्यान ५ जणांचे शिष्टमंडळ मुबईकडे गेल्या नंतर बाकी मोर्चेकरी खर्डी जवळील हॉटेल प्रांजली येथे थांबवून ठेवले असून उपविभागीय पोलीस अधिकारी  मिलींद शिंदे, विकास नाईक,शहापूर  प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे, घनश्याम आढाव ,महामार्ग पोलीस अधिकारी राकेश डांगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर ,आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी  किल्लेदार ह्या आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह मोर्चेकरांसाठी अन्न,पाणी सुविधासाठी प्रयत्नशील होत्या.

रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते. विशेषतः त्यांनी स्वतः त्यांच्या बंगल्यावर ८ वाजता मोर्चकऱ्यांसोबत बैठक लावली होती परंतु मंत्र्यांनी रात्रीचे ९ वाजून गेले  तरी वेळ पाळाली नसल्याचे समजते