शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

उल्हासनगरात वालधुनी नदीचे पाणी शिरल्याने शेकडोचे संसार उघडयावर

By सदानंद नाईक | Updated: July 19, 2023 16:42 IST

उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

उल्हासनगर - संततधार पावसाने वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदी किनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधी नगर, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणी नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने, शेकडोचे संसार उघडयावर पडले. महापालिकेने नदी किनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन बाधित शेकडो नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. 

उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्रभर संततधार पाऊस पडल्याने, सकाळ पासूनच भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, इमलीपाडा, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधी नगर, करोतीयानगर परिसरात पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली. नागरिकांनी हातात मिळेल ते सामान वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील कपडे, साहित्य व अन्नधान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या शेकडो जणांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पुराच्या पाण्याची पाहणी करून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

वालधूनी नदी किनारा परिसरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर, सीएचएम कॉलेज, आम्रपाली शाळा, सेंट जोशेफ, ग्रँड गुरुकुल आदी अनेक शाळेत पुराचे पाणी घुसल्याने, शाळांना सुट्टी देण्यात आली. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळेत पुराचे पाणी घुसून, शैक्षणिक साहित्यासह संगणक भिजून गेले. तसेच सतर्कता म्हणून पुरक्षेत्रातील वीजपुरवठा महावितरण विभागाने बंद केला. सी ब्लॉक, शहाड फाटक, राजीव गांधीनगर, आयटीआय कॉलेज, फर्निचर मार्केट, शांतीनगर आदी ठिकाणीही पाणी साचून पुरपरिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. 

धोकादायक घर जमीनदोस्त

कॅम्प नं-३ येथील पंजाबी कॉलनी येथील एक घर धोकादायक झाल्याची माहिती महापालिकेकडे आल्यावर, महापालिका अतिक्रमण पथकाने दुपारी घर जमीनदोस्त केले. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच शहरातील घोषित धोकादायक इमारतीकडे महापालिकेचे लक्ष असल्याचे शिंपी म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरRainपाऊस