शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत

By अजित मांडके | Updated: April 1, 2023 16:06 IST

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीला अटक केली आहे.

ठाणे :  काही दिवसांपूर्वीच हिंगोली आणि नांदेड येथील शेतकऱ्यांचे  धान्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीला अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात भिवंडी तसेच राज्यातील इतर भागात घरफोडी करणाऱ्या टोळीतील काही सदस्य हे कल्याणफाटा येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप पाटील यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापूरे,  पोलीस हवालदार राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, अमोल देसाई, नामदेव मुंडे, बाळु मुकणे, शिपाई सागर सुरकळ, समीर  लाटे यांचे पथक तयार केले.

पथकाने सापळा रचून शफरतउल्लाह, हैदर आणि शेर खान यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांचा साथिदार जमील मलिक याचेही नाव समोर आले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यातील शफरतउल्लाह, हैदर आणि शेर या तिघांविरोधात भिवंडी सह नांदेड, हिंगोली येथेही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच हिंगोली आणि नांदेड येथील शेतकºयांच्या धान्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. विधानसभेतही हा मुद्दा तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित झाला होता. येथील हरभरा, सोयाबीनचा पोती चोरण्यात आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींविरोधात कारवाईसाठी तसेच पुढील तपासासाठी तिघांचा ताबा हिंगोली पोलीस घेणार आहेत. त्यानुसार ठाणे पोलिसांनी तशी कारवाई सुरु केली आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी