शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर

By सुरेश लोखंडे | Updated: March 4, 2024 17:53 IST

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता.

ठाणे : जिल्हा परिषदेचे कामकाज सध्या प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र ग्रामीण जनतेच्या हक्काच्या सेस फंडातून कार्यालयांचे भाडे भरण्याची मनमानी केली जात असून ठराव मंजूर करून सदस्यांनी सुचवलेले विकास कामे त्यांना न देता ठेकेदारांशी हात मिळवणी करून त्यांना वाटप केल्याच्या आराेपासह मुख्यालयाच्या इमारती व्यतिरिक्त अन्यत्र असलेले कार्यालये भाड्याच्या इमारतीत न हालवण्याचा जाब विचारण्यासाठी तब्बल १५ ते २० सदस्यांनी जिल्हा परिषद गाठून प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या ठरावानुसार विकास कामे सुरू केली. मात्र ती सर्व कामे त्यांच्या मर्जीच्या ठेकेदारास देऊन मनमानीपणे उरकून घेतली जात आहे. त्यासाठी संबंधित माजी सदस्यांना विश्वासत घेतले नाही, त्यांच्या नावे कामे केली जात असल्याचे सुचवले जात नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारास कामे देऊन अन्याय केल्याचा आराेप करीत या माजी सदस्यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरत अधिकाऱ्यांनी त्यांची मनमानी वेळीच थांबवण्याचा इशरा दिला. यावेळी या सदस्यांना कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे आणि ग्राम पंचायत विभागाचे आदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भेटले त्यांना या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

कन्या शाळा, आराेग्य विभागाच्या इमारतीच्या भूखंडाचा विकास ठाणे महापालिकेला करायला न देता ताे जिल्हा परिषदेकडूनच करण्यात यावा. त्यापाेटी जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न वाढवता येईल आणि सेस फंडात ते जमा करता येईल. त्यामुळे ठाणे महापालिका किंवा अन्य खासगी विकासकाकडून या भूखंडांचा विकास करण्यास या सदस्यांनी विराेध केला. तर जिल्हा परिषदेचे मुख्य इमारत बांधण्यासाठी कॅम्पसमधील कार्यालये वागळे इस्टेटच्या जुन्या कंपनीत हलवण्यात यावे. मात्र उर्विरीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमधील कार्यालये, आराेग्याच्या इमारतीमधील कार्यालये, बांधकाम विभागाच्या कॅम्पसमधील कार्यालये भाड्याच्या इमारतीत हलवून नये. त्यामुळे त्यांच्या भाड्यापाेटी खर्च हाेणारी सेसफंडाची रक्कम बचत करता येईल. पाच वर्षेापर्यंत काेट्यवधी रूपये सेसे फंडातून खर्च हाेऊन ग्रामीण जनतेवर अन्याय हाेईल. या भाड्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभागाने या कार्यलयांचे भाडे भरण्यात यावे आदींचा जाब या माजी सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचायन त्यांना चांगलेच धारेवर धरले. .

टॅग्स :thaneठाणे