शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर

By सुरेश लोखंडे | Updated: March 4, 2024 17:53 IST

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता.

ठाणे : जिल्हा परिषदेचे कामकाज सध्या प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र ग्रामीण जनतेच्या हक्काच्या सेस फंडातून कार्यालयांचे भाडे भरण्याची मनमानी केली जात असून ठराव मंजूर करून सदस्यांनी सुचवलेले विकास कामे त्यांना न देता ठेकेदारांशी हात मिळवणी करून त्यांना वाटप केल्याच्या आराेपासह मुख्यालयाच्या इमारती व्यतिरिक्त अन्यत्र असलेले कार्यालये भाड्याच्या इमारतीत न हालवण्याचा जाब विचारण्यासाठी तब्बल १५ ते २० सदस्यांनी जिल्हा परिषद गाठून प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या ठरावानुसार विकास कामे सुरू केली. मात्र ती सर्व कामे त्यांच्या मर्जीच्या ठेकेदारास देऊन मनमानीपणे उरकून घेतली जात आहे. त्यासाठी संबंधित माजी सदस्यांना विश्वासत घेतले नाही, त्यांच्या नावे कामे केली जात असल्याचे सुचवले जात नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारास कामे देऊन अन्याय केल्याचा आराेप करीत या माजी सदस्यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरत अधिकाऱ्यांनी त्यांची मनमानी वेळीच थांबवण्याचा इशरा दिला. यावेळी या सदस्यांना कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे आणि ग्राम पंचायत विभागाचे आदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भेटले त्यांना या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

कन्या शाळा, आराेग्य विभागाच्या इमारतीच्या भूखंडाचा विकास ठाणे महापालिकेला करायला न देता ताे जिल्हा परिषदेकडूनच करण्यात यावा. त्यापाेटी जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न वाढवता येईल आणि सेस फंडात ते जमा करता येईल. त्यामुळे ठाणे महापालिका किंवा अन्य खासगी विकासकाकडून या भूखंडांचा विकास करण्यास या सदस्यांनी विराेध केला. तर जिल्हा परिषदेचे मुख्य इमारत बांधण्यासाठी कॅम्पसमधील कार्यालये वागळे इस्टेटच्या जुन्या कंपनीत हलवण्यात यावे. मात्र उर्विरीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमधील कार्यालये, आराेग्याच्या इमारतीमधील कार्यालये, बांधकाम विभागाच्या कॅम्पसमधील कार्यालये भाड्याच्या इमारतीत हलवून नये. त्यामुळे त्यांच्या भाड्यापाेटी खर्च हाेणारी सेसफंडाची रक्कम बचत करता येईल. पाच वर्षेापर्यंत काेट्यवधी रूपये सेसे फंडातून खर्च हाेऊन ग्रामीण जनतेवर अन्याय हाेईल. या भाड्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभागाने या कार्यलयांचे भाडे भरण्यात यावे आदींचा जाब या माजी सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचायन त्यांना चांगलेच धारेवर धरले. .

टॅग्स :thaneठाणे