शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:40 IST

अंबरनाथमध्ये ४५ वर्षांपासून पुतळ्याची उपेक्षा

पंकज पाटील

अंबरनाथ : औद्योगिकीकरणाचा वारसा लाभलेल्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत १९७२ मध्ये उभारलेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा गेली ४५ वर्षे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही.  त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. आता चौथरा नादुरुस्त झाल्याने पुतळ्याची दिशा बदलून प्रवेशद्वाराकडे तोंड केले जाणार आहे. त्यानंतर तरी पुतळ्याची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा आहे.

स्वतंत्र भारताची पायाभरणी करणारे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला. त्यानुसार १९७२ मध्ये कामाला सुरुवात झाली. काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकाळात पुतळा उभारण्यात येणार होता. अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागूनच उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तेव्हा एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पालिका बरखास्त केली होती.

अंबरनाथ पालिका बरखास्त झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण- डोंबिवली महापालिकेत करण्यात आला; परंतु कल्याण- डोंबिवली महापालिकेनेदेखील पुतळ्याकडे दुर्लक्ष केले. कल्याण- डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा १९९२ मध्ये नगरपालिकेची पुनर्स्थापना करण्यात आली. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपची नगरपालिकेत सत्ता आली. या सत्ता स्थापनेपासून आजपर्यंत सत्ताधारी शिवसेना- भाजपने पुतळ्याकडे दुर्लक्षच केले.

पं. जवाहरलाल नेहरूंचे उद्यानालाही नाव 

१९७२ मध्ये पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील शिल्पकार हरीश तालीम यांनी हा पुतळा तयार केला होता.१९७८ मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुतळ्याचे अनावरण झाले नाही.पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला, त्या उद्यानालाही पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव देण्यात आले. उद्यानाला नाव दिले असले तरी पुतळ्याचे अनावरण झालेले नाही.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, पुन्हा एकदा हा पुतळा चर्चेत आला आहे.पुतळ्याचा चौथरा कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती करून हा पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभा केला जाणार आहे.