शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:40 IST

अंबरनाथमध्ये ४५ वर्षांपासून पुतळ्याची उपेक्षा

पंकज पाटील

अंबरनाथ : औद्योगिकीकरणाचा वारसा लाभलेल्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत १९७२ मध्ये उभारलेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा गेली ४५ वर्षे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही.  त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. आता चौथरा नादुरुस्त झाल्याने पुतळ्याची दिशा बदलून प्रवेशद्वाराकडे तोंड केले जाणार आहे. त्यानंतर तरी पुतळ्याची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा आहे.

स्वतंत्र भारताची पायाभरणी करणारे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला. त्यानुसार १९७२ मध्ये कामाला सुरुवात झाली. काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकाळात पुतळा उभारण्यात येणार होता. अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागूनच उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तेव्हा एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पालिका बरखास्त केली होती.

अंबरनाथ पालिका बरखास्त झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण- डोंबिवली महापालिकेत करण्यात आला; परंतु कल्याण- डोंबिवली महापालिकेनेदेखील पुतळ्याकडे दुर्लक्ष केले. कल्याण- डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा १९९२ मध्ये नगरपालिकेची पुनर्स्थापना करण्यात आली. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपची नगरपालिकेत सत्ता आली. या सत्ता स्थापनेपासून आजपर्यंत सत्ताधारी शिवसेना- भाजपने पुतळ्याकडे दुर्लक्षच केले.

पं. जवाहरलाल नेहरूंचे उद्यानालाही नाव 

१९७२ मध्ये पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील शिल्पकार हरीश तालीम यांनी हा पुतळा तयार केला होता.१९७८ मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुतळ्याचे अनावरण झाले नाही.पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला, त्या उद्यानालाही पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव देण्यात आले. उद्यानाला नाव दिले असले तरी पुतळ्याचे अनावरण झालेले नाही.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, पुन्हा एकदा हा पुतळा चर्चेत आला आहे.पुतळ्याचा चौथरा कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती करून हा पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभा केला जाणार आहे.