शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:59 IST

ब्रह्मांड कट्टा ही एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. या व्यासपीठावर नवीन कलाकारांना संधी दिली जाते, त्यांच्या कलेच गुणगान केले जाते.  

ठळक मुद्दे ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिसकथा सादर करुन बालकलाकारांनी दिली साथ कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने मांडला

ठाणे : एक नवीन प्रयोग वर्षा गंद्रे यांनी ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात सादर केला. स्वलिखीत कथा रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाट्यकलेचा आधार घेणारा कथार्सिस हा अभिनव प्रकार नाशिकच्या नीरज करंदीकर व त्याला दोन टि. व्ही. स्टार बाल कलाकार विहान जोशी व श्रेयस आपटे यांनी आपआपल्या कथा सादर करुन साथ दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या कालाघोडा फेस्टीवलच्या आयोजक कमिटी सदस्या वर्षा कारळे हस्ते दिप प्रज्वलित करुन वर्षा गंद्रे यांनी विनायका गो सिध्द गणेशा ही गणेश वंदना सादर करण्यात आली. भारतात प्राचीन कालापासून कीर्तन हा प्रकार मंदिरात केला जायचा. त्यात नारदीय कीर्तन कथेच्या स्वरुपात सांगितले जात असे तसेच समाज प्रबोधन पर उपदेश कीर्तनकार त्यातून करत असायचे. असेच एक कीर्तन बाल कलाकार विहान अविनाश जोशी यांनी केले. विहान जोशीने एकपात्री स्पर्धांतून खुप बक्षीसे मिळवली आहेत. त्यांने कीर्तनात संत तुकारामाचे अभंग सादर केले. अंत्यंत सुमधुर वाणी व गोड आवाज;  स्पष्ट उच्चार यावर प्रभुत्व असलेल्या विहानने कीर्तन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्याला तबल्यावर डॉ. अविनाश जोशी तर हारमोनियनवर विद्या जोशी यांनी साथ केली. त्यानंतर नासिक वरुन आलेला कलाकार नीरज करंदीकर यांनी स्वलिखीत कथा अत्यंत उत्कृष्ट अभिनय व आवाजाचे चढउतार करुन सादर केल्या.  कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने त्याच्या पोएटीकस ह्या पुस्तकात पहिल्यांदा मांडला.  कथार्सिस म्हणजे मनात खोलवर दडून बसलेल्या त्रासदायक भावनांना कथानकांच्या द्वारे मुक्त किंवा व्यक्त करणे.  मराठीतील कथा आणि उर्वरित शब्द इंग्रजी मध्ये लिहून कथार्सिस असे प्रयोगशीलता दर्शवणाऱ्या नावाने हा प्रयोग नीरज करंदीकर व अद्वैत मोरे यांनी सुरु केला आहे असे प्रतिपादन निवेदीका वर्षा गंद्रे यांनी केले. निरज करंदीकर याने सादर केलेल्या गणपतीच्या कथेत एका लहान मुलाची निष्पापता,  त्याच्यावर झालेले संस्कार,  सध्याची महागाई व पर्यावरणाची होणारी ऱ्हास यावरील उपाय याचा सुरेख संगम होता. नीरज यांनी सादर केलेल्या गिल्ट या कथेत सध्याची सामाजिक परिस्थिति व्यथित केली.  वृध्दाॆच्या समस्या मांडल्य. नीरज यांच्या कथा अर्ध पुर्ण व अभिनयातून सादरीकरणात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.  शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सुराज्य असावे अशी प्रत्येकाची मनोमनी ईच्छा असते. यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते,  अशी शंभु राजांना वाटणारी भावना बाल कलाकार श्रेयस आपटे यांनी त्याच्या कथेतून व अभिनयातून सादर केली.  त्याच्या कलाविष्कार बघताना स्वराज्याचे सुराज्य प्रेक्षकांच्या मनात उलगडत गेले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गायन वर्षा गंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक महेश जोशी व कलाकारांचे स्वागत स्नेहल जोशी यांनी केले.  प्रमुख पाहुण्या वर्षा कारळे यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व कालाघोडा फेस्टीवला येण्यास आमंत्रित केले. कार्यक्रमाची सांगता गणपती बाप्पाच्या आरतीने करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई