शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:59 IST

ब्रह्मांड कट्टा ही एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. या व्यासपीठावर नवीन कलाकारांना संधी दिली जाते, त्यांच्या कलेच गुणगान केले जाते.  

ठळक मुद्दे ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिसकथा सादर करुन बालकलाकारांनी दिली साथ कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने मांडला

ठाणे : एक नवीन प्रयोग वर्षा गंद्रे यांनी ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात सादर केला. स्वलिखीत कथा रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाट्यकलेचा आधार घेणारा कथार्सिस हा अभिनव प्रकार नाशिकच्या नीरज करंदीकर व त्याला दोन टि. व्ही. स्टार बाल कलाकार विहान जोशी व श्रेयस आपटे यांनी आपआपल्या कथा सादर करुन साथ दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या कालाघोडा फेस्टीवलच्या आयोजक कमिटी सदस्या वर्षा कारळे हस्ते दिप प्रज्वलित करुन वर्षा गंद्रे यांनी विनायका गो सिध्द गणेशा ही गणेश वंदना सादर करण्यात आली. भारतात प्राचीन कालापासून कीर्तन हा प्रकार मंदिरात केला जायचा. त्यात नारदीय कीर्तन कथेच्या स्वरुपात सांगितले जात असे तसेच समाज प्रबोधन पर उपदेश कीर्तनकार त्यातून करत असायचे. असेच एक कीर्तन बाल कलाकार विहान अविनाश जोशी यांनी केले. विहान जोशीने एकपात्री स्पर्धांतून खुप बक्षीसे मिळवली आहेत. त्यांने कीर्तनात संत तुकारामाचे अभंग सादर केले. अंत्यंत सुमधुर वाणी व गोड आवाज;  स्पष्ट उच्चार यावर प्रभुत्व असलेल्या विहानने कीर्तन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्याला तबल्यावर डॉ. अविनाश जोशी तर हारमोनियनवर विद्या जोशी यांनी साथ केली. त्यानंतर नासिक वरुन आलेला कलाकार नीरज करंदीकर यांनी स्वलिखीत कथा अत्यंत उत्कृष्ट अभिनय व आवाजाचे चढउतार करुन सादर केल्या.  कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने त्याच्या पोएटीकस ह्या पुस्तकात पहिल्यांदा मांडला.  कथार्सिस म्हणजे मनात खोलवर दडून बसलेल्या त्रासदायक भावनांना कथानकांच्या द्वारे मुक्त किंवा व्यक्त करणे.  मराठीतील कथा आणि उर्वरित शब्द इंग्रजी मध्ये लिहून कथार्सिस असे प्रयोगशीलता दर्शवणाऱ्या नावाने हा प्रयोग नीरज करंदीकर व अद्वैत मोरे यांनी सुरु केला आहे असे प्रतिपादन निवेदीका वर्षा गंद्रे यांनी केले. निरज करंदीकर याने सादर केलेल्या गणपतीच्या कथेत एका लहान मुलाची निष्पापता,  त्याच्यावर झालेले संस्कार,  सध्याची महागाई व पर्यावरणाची होणारी ऱ्हास यावरील उपाय याचा सुरेख संगम होता. नीरज यांनी सादर केलेल्या गिल्ट या कथेत सध्याची सामाजिक परिस्थिति व्यथित केली.  वृध्दाॆच्या समस्या मांडल्य. नीरज यांच्या कथा अर्ध पुर्ण व अभिनयातून सादरीकरणात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.  शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सुराज्य असावे अशी प्रत्येकाची मनोमनी ईच्छा असते. यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते,  अशी शंभु राजांना वाटणारी भावना बाल कलाकार श्रेयस आपटे यांनी त्याच्या कथेतून व अभिनयातून सादर केली.  त्याच्या कलाविष्कार बघताना स्वराज्याचे सुराज्य प्रेक्षकांच्या मनात उलगडत गेले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गायन वर्षा गंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक महेश जोशी व कलाकारांचे स्वागत स्नेहल जोशी यांनी केले.  प्रमुख पाहुण्या वर्षा कारळे यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व कालाघोडा फेस्टीवला येण्यास आमंत्रित केले. कार्यक्रमाची सांगता गणपती बाप्पाच्या आरतीने करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई