शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:59 IST

ब्रह्मांड कट्टा ही एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. या व्यासपीठावर नवीन कलाकारांना संधी दिली जाते, त्यांच्या कलेच गुणगान केले जाते.  

ठळक मुद्दे ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिसकथा सादर करुन बालकलाकारांनी दिली साथ कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने मांडला

ठाणे : एक नवीन प्रयोग वर्षा गंद्रे यांनी ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात सादर केला. स्वलिखीत कथा रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाट्यकलेचा आधार घेणारा कथार्सिस हा अभिनव प्रकार नाशिकच्या नीरज करंदीकर व त्याला दोन टि. व्ही. स्टार बाल कलाकार विहान जोशी व श्रेयस आपटे यांनी आपआपल्या कथा सादर करुन साथ दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या कालाघोडा फेस्टीवलच्या आयोजक कमिटी सदस्या वर्षा कारळे हस्ते दिप प्रज्वलित करुन वर्षा गंद्रे यांनी विनायका गो सिध्द गणेशा ही गणेश वंदना सादर करण्यात आली. भारतात प्राचीन कालापासून कीर्तन हा प्रकार मंदिरात केला जायचा. त्यात नारदीय कीर्तन कथेच्या स्वरुपात सांगितले जात असे तसेच समाज प्रबोधन पर उपदेश कीर्तनकार त्यातून करत असायचे. असेच एक कीर्तन बाल कलाकार विहान अविनाश जोशी यांनी केले. विहान जोशीने एकपात्री स्पर्धांतून खुप बक्षीसे मिळवली आहेत. त्यांने कीर्तनात संत तुकारामाचे अभंग सादर केले. अंत्यंत सुमधुर वाणी व गोड आवाज;  स्पष्ट उच्चार यावर प्रभुत्व असलेल्या विहानने कीर्तन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्याला तबल्यावर डॉ. अविनाश जोशी तर हारमोनियनवर विद्या जोशी यांनी साथ केली. त्यानंतर नासिक वरुन आलेला कलाकार नीरज करंदीकर यांनी स्वलिखीत कथा अत्यंत उत्कृष्ट अभिनय व आवाजाचे चढउतार करुन सादर केल्या.  कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने त्याच्या पोएटीकस ह्या पुस्तकात पहिल्यांदा मांडला.  कथार्सिस म्हणजे मनात खोलवर दडून बसलेल्या त्रासदायक भावनांना कथानकांच्या द्वारे मुक्त किंवा व्यक्त करणे.  मराठीतील कथा आणि उर्वरित शब्द इंग्रजी मध्ये लिहून कथार्सिस असे प्रयोगशीलता दर्शवणाऱ्या नावाने हा प्रयोग नीरज करंदीकर व अद्वैत मोरे यांनी सुरु केला आहे असे प्रतिपादन निवेदीका वर्षा गंद्रे यांनी केले. निरज करंदीकर याने सादर केलेल्या गणपतीच्या कथेत एका लहान मुलाची निष्पापता,  त्याच्यावर झालेले संस्कार,  सध्याची महागाई व पर्यावरणाची होणारी ऱ्हास यावरील उपाय याचा सुरेख संगम होता. नीरज यांनी सादर केलेल्या गिल्ट या कथेत सध्याची सामाजिक परिस्थिति व्यथित केली.  वृध्दाॆच्या समस्या मांडल्य. नीरज यांच्या कथा अर्ध पुर्ण व अभिनयातून सादरीकरणात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.  शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सुराज्य असावे अशी प्रत्येकाची मनोमनी ईच्छा असते. यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते,  अशी शंभु राजांना वाटणारी भावना बाल कलाकार श्रेयस आपटे यांनी त्याच्या कथेतून व अभिनयातून सादर केली.  त्याच्या कलाविष्कार बघताना स्वराज्याचे सुराज्य प्रेक्षकांच्या मनात उलगडत गेले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गायन वर्षा गंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक महेश जोशी व कलाकारांचे स्वागत स्नेहल जोशी यांनी केले.  प्रमुख पाहुण्या वर्षा कारळे यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व कालाघोडा फेस्टीवला येण्यास आमंत्रित केले. कार्यक्रमाची सांगता गणपती बाप्पाच्या आरतीने करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई