शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे महापालिका हद्दीतील पाईप लाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:15 IST

पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे.

ठळक मुद्देपाईप लाईन लगत १५०० च्या आसपास झोपड्याबैठकीनंतर पुनर्वसनचा होणार निर्णय

ठाणे - ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन जवळ असलेल्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या असमन्वयामुळे अजूनही सुटलेला नसल्याची बाब समोर आली आहे. या झोपड्यांवर अद्याप कारवाई सुध्दा झालेली नाही. ठाणे आणि मुंबई महापालिकेची एक संयुक्त बैठक लवकरच होणार असून त्यानंतरच या नागरिकांचा पुनर्वसनाचा तिढा सुटणार असल्याचे पालिकेने आता स्पष्ट केले आहे.            शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्द्याला हात घातला. वन विभागाच्या जागेवरील झोपड्यांना मालमत्ता कर लावता येत नसल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेसाठी आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन लगत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर कसा लावण्यात आला असा प्रश्न भोईर यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ज्यांना आपण सेवा सुविधा देतो त्यांना मालमत्ता कर लावत असल्याचे स्पष्ट करत अनाधिकृत स्ट्रक्चर असेल आणि त्याला मालमत्ता कर लावण्यात आला असेल तरीही ते स्ट्रक्चर अधिकृत होत नसल्याचे बुरपुल्ले यांनी सभागृहात स्पष्ट केले.देवराम भोईर यांनी मुंबई महापालिकेच्या तानसा पाईप लाईन जवळ असलेल्या झोपड्यांना कारवाईच्या नोटीसा पाठवण्यात आल्या असून ठाणे महापालिकेने त्यांना मालमत्ता कर लावला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या झोपड्यांवर ठाणे आणि मुंबई महापालिकेनेकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे बुरपुल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात २०१२ मध्येच न्यायालयाची नोटीस पाठवली असून यामध्ये या सर्व झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यांचे पुनर्वसन कोणी करायचे यासंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले.या पाईपलाईन लगत १५०० पेक्षा अधिक झोपड्या असून २०१५ ला ही पाईपलीन ज्यावेळी फुटली होती त्यावेळी वागळे, किसन नगर,भागातील हजारो नागरिकांचे नुकसान झाले होते. आता या सर्वांचा पुनर्वसनाचा प्रश्न या दोन यंत्रणाच्या बैठकीनंतरच निकाली निघणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त