शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सीडीरेशो मॅच होत नसल्यामुळे ठाणेच्या टीडीसीसी बँक सुस्थितीत नसल्याची खंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:23 IST

टीडीसीसी बँकेला ३० कोटींचा नफा झाल्याचे सुतोवाच बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. त्यावर बोलताना पाटील यांनी बँकेच्या सहा हजारांच्या ठेवी असल्याचे अधिकाऱ्यांच्या तोंडून वळवून घेतले. कर्ज दोन हजार २२ कोटींचे दिल्याचे समजून घेतले. यावर मात्र पाटील यांनी संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची शाळा घेत सांगितले, की बँक सुस्थितीत असण्यासाठी ठेवीच्या ५० टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे बँकेने ४१ हजार लाख रूपयांचा कर्ज पुरवठा केल्याबँके सुस्थितीत ठेवण्यासाठी ठेवींच्या ५५ ते ६० टक्के कर्ज पुरवठा करावा लागेलसीडीरेशो मॅच होत नसल्यामुळे बँक सुस्थितीत आहे

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचा कर्ज पुरवठा ठेवींच्या ५० टक्के पेक्षा कमी झालेला आहे. यामुळे बँकेचा सीडीरेशो मॅच होत नाही. यावरून बँक आर्थिक सुस्थितीत आहे, असे म्हणता येत नसल्याची खंत या बँकेचे माजी अध्यक्ष खासदार कपील पाटील यांनी व्यक्त करून बँकेच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांना ६० व्या वार्षिक सभेत चांगल्याच कान पिचक्या देत मार्गदर्शनही केले.येथील गडकरी रंगायतनमध्ये मंगळवारी बँकेची वार्षिक बैठक पार पडली. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करीताना पाटील यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा देखील घेतला. टीडीसीसी बँकेला ३० कोटींचा नफा झाल्याचे सुतोवाच बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. त्यावर बोलताना पाटील यांनी बँकेच्या सहा हजारांच्या ठेवी असल्याचे अधिकाऱ्यांच्या तोंडून वळवून घेतले. कर्ज दोन हजार २२ कोटींचे दिल्याचे समजून घेतले. यावर मात्र पाटील यांनी संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची शाळा घेत सांगितले, की बँक सुस्थितीत असण्यासाठी ठेवीच्या ५० टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. बँकेने केलेला कर्ज पुरवठा आणि ठेवी यांचा सीडीरेशो ५० टक्के पेक्षाही कमी आहे. सीडीरेशो मॅच होत नसल्यामुळे बँक सुस्थितीत आहे, असे म्हणता येत नसल्याची खंत पाटील यांनी व्यासपीठावर व्यक्त केली.बँके सुस्थितीत ठेवण्यासाठी ठेवींच्या ५५ ते ६० टक्के कर्ज पुरवठा करावा लागेल. तेव्हा सीडीरेशो मॅच होईल आणि बँक सुस्थितीत येईल अन्यथा बँक कोणत्याही क्षणी घाट्यात येण्याची शक्यता पाटील यांनी व्यासपीठावरून व्यक्त केली. शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात कर्ज पुरवठा होत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याऐवजी सांगलीला कर्ज पुरवठा होत असल्याची बाबही पाटील यांनी उघड केली. बँकेने ४१ हजार लाख रूपयांचा कर्ज पुरवठा केल्याचे दिसून येत आहे. पण हा कर्ज पुरवठा पगार तारणावर केलेला आहे. त्यातून ३० कोटींचा नफा झालेला आहे. पण शेतकऱ्यांची बँक असून केवळ पगार तारणावरच कर्ज पुरवठा करण्याची मानसिकता आता बदला. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना कर्ज पुरवठा करा. तरूणांनाकडे लक्ष र्केंद्रीत करून दहा - दहा जणांच्या गृपच्या शेतीसाठी त्यांना तयार करा. त्यांच्या हाताला रोजगार द्या. भूमिपुत्रांना एकत्र करून त्यांचे दुधाचे प्लॅट उभे करण्याचे मार्गदर्शन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी काही उपस्थितानी जास्त एनपीए प्रोहिजन केल्याच्या आरोपासह पतसंस्था वाचवा, मानधनाचा विषय नफ्याच्या वाटणीत येत नाही, इंडस्ट्रियल रिटर्न आदीं आरोपांसह आयत्यावेळी आलेल्या प्रश्नांना अध्यक्षांसह अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन उपस्थितांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :thaneठाणेBanking Sectorबँकिंग क्षेत्र