शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

ठाण्याचे कामगार रुग्णालयच मरणपंथाला, उपचारासाठी धरावी लागतेय मुंबईची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:58 IST

आज एका बाजूला शहरात मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालये उभी राहत असताना गरीब, कामगारांसाठी बांधलेले रूग्णालय मात्र शेवटच्या घटका मोजत आहे.

आज एका बाजूला शहरात मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालये उभी राहत असताना गरीब, कामगारांसाठी बांधलेले रूग्णालय मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. या कामगार रूग्णालयासाठी वास्तविक केंद्राकडून निधी मिळूनही सुधारणा झालेली नाही. मग हा निधी गेला कुठे हा खरा प्रश्न आहे. यावर लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वागळे इस्टेट येथील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयच (इएसआयएस) मरणासन्न अवस्थेत असून तत्कालीन ५०० बेडच्या या रुग्णालयात आता केवळ १०० बेड उरले आहेत. शस्त्रक्रियेसह अनेक विभागांना टाळे लागले आहे. किरकोळ आजाराला तुटपुंजी औषधे देऊन बोळवण केली जाते. तर गंभीर रुग्णाला मात्र मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे १५ हजाराहून २१ हजार वेतन घेणाºयांना राज्य सरकारने ‘इएसआयएस’च्या कक्षेत आणले आहे. तर दुसरीकडे रुग्णालयच ‘अत्यवस्थ’ असल्यामुळे आधी किमान त्याचा कायापालट करून सुसज्ज रुग्णालय उभारावे, अशी माफक अपेक्षा येथील कामगारांनी व्यक्त केली आहे.वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट या एकेकाळी आशियातील सर्वात मोठया असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक हजाराहून अधिक कारखाने होते. त्याठिकाणी राबणाºया कामगार वर्गाची संख्याही लक्षणीय होती. याच कामगारांसाठी केंद्र सरकारने कामगार राज्य विमा योजना रुग्णालय बांधले. तब्बल २८ एकरच्या परिसरात तळ अधिक पाच मजली रुग्णालयाची भव्य इमारत आहे. तर रुग्णालयासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी तिथेच कर्मचाºयांसाठी तळ अधिक चार मजली २७ निवासस्थानांच्या इमारती आहेत. अर्थात, रुग्णालयाला जशी अवकळा आली आहे तशीच या निवासस्थानांचीही स्थिती धोकादायक झाल्याने अवघ्या पाच इमारतींमध्ये आता कर्मचाºयांची निवासस्थाने आहेत.या रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक विभागांना दिवसाही टाळे लागलेले होते. क्वचित ओपीडी विभाग, औषधपुरवठा विभाग कसाबसा तग धरून सुरू आहे. हाच काय तो कामगारांना रुग्णालयाचा दिलासा. एका कामगाराचा मुलगा उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने आला असता, त्याला तात्पुरती औषधे देऊन त्याची बोळवण केली. अधिक उपचारासाठी मुलुंडच्या कामगार रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. असाच सल्ला अनेक कामगार रुग्णांना मुंबईकडे जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने हे रुग्णालय म्हणजे राज्य सरकारने ठाण्यातील कामगारांसाठी एक केवळ औपचारिकता म्हणून ठेवलेली यंत्रणा आहे का? असाही सवाल केला जात आहे.- जितेंद्र कालेकर, ठाणे