शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

ठाणेकरांनी सीगल्सला कृत्रिम खाद्यपदार्थ देऊन जिवाशी खेळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

ठाणे : सध्या तलावपाळी येथे मोठ्या प्रमाणावर सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी पाहायला मिळत आहेत. या पक्ष्यांना इतक्या जवळून पाहणे ...

ठाणे : सध्या तलावपाळी येथे मोठ्या प्रमाणावर सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी पाहायला मिळत आहेत. या पक्ष्यांना इतक्या जवळून पाहणे ही ठाणेकरांसाठी पर्वणीच आहे; परंतु या पक्ष्यांना तलावपाळी येथे फिरायला येणारे ठाणेकर कृत्रिम खाद्यपदार्थ खायला घालून त्यांना त्यांच्या मूळ खाण्यापासून परावृत्त करत आहेत. सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी हे सर्वभक्षी असल्याने त्यांना अशा प्रकारचे कृत्रिम खाद्य देऊन त्यांच्या जिवाशी खेळणे थांबवावे. यासाठी ठाण्यातील पक्षीप्रेमींनी रविवारी सकाळी तलावपाळी येथे जनजागृती केली.

पाणथळ जागांवरच्या अधिवासात सामान्यतः जिवंत व मृत छोटे मासे, खेकडे, किडे यावर कुरव पक्ष्यांची गुजराण चालते. त्यांना परतीच्या प्रवासासाठी लागणारी ऊर्जा नैसर्गिकरीत्या प्राप्त होत असलेल्या या अन्नाद्वारे प्रथिने व जीवनसत्वांमधून मिळते. अतिरिक्त ऊर्जा ही चरबीच्या रूपात शरीरात साठवून ठेवली जाते. परतीच्या प्रवासात अन्नाबाबत शाश्वती नसते, तसेच प्रवास निर्धारित वेळेत पार पाडावयाची असतो, कारण विणीच्या हंगामासाठी त्यांना हिमालयामधील आपल्या अधिवासात त्याची जय्यत तयारी करावयाची असते. ही सर्व गणिते जुळवायची तर त्यांचा विणीपूर्व स्थलांतराचा हंगाम हा चांगलेचुंगले अन्न खाऊन धष्टपुष्ट होण्याचा असायला हवा; परंतु आजकाल ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये नागरिकांकडून त्यांना शेव, गाठी, पाव, बिस्किटे इतर धान्य असे चारण्याचा प्रकार सर्रास घडताना दिसतो आहे. यामागे नागरिकांचा हेतू जरी चांगला असला तरी यामुळे पक्ष्यांचे फार मोठे नुकसान होते. कुतूहलापोटी, मनोरंजनाकरिता किंवा भूतदयेच्या कल्पनेमुळे जरी नागरिक पक्ष्यांना खाऊ घालत असले, तरी असे कृत्रिम अन्न त्यांना एकतर पचवता येत नाही किंवा त्यापासून त्यांच्या शरीराला धोका पोहोचतो. असे खाणे हे त्यांच्याकरिता विषासमान असते याची त्यांना जाणीव नसते. शरीराला जीवनावश्यक घटक न मिळाल्याने ते अनेक रोगांना सहजच बळी पडतात. कुरव पक्षी कळपात राहणारे असल्याने झपाट्याने अशा रोगांचा प्रादुर्भाव कळपातील इतर निरोगी पक्ष्यांमध्ये पसरू शकतो. जवळच्या शहरी पक्ष्यांमध्ये सुद्धा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता असते, असे जनजागृतीत सांगण्यात आले.

---------------

बातमी पुढे