शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

ठाणेकरांचा दुसरा दिवसही वाहतूककोंडीत, ठेकेदारांमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:36 IST

ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती.

ठाणे - ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने कोंडीची तीव्रता वाढली. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. शनिवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याचे काम सुरूकेल्याने कोंडी झाली होती. मात्र, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे शुक्रवारी सांगणाºया वाहतूक पोलिसांनी शनिवारी ते दाखल न करता केवळ नोटिसा बजावल्या, असे सांगितले. वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेविषयी वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी सकाळीही घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. सकाळी ८ पासून घोडबंदर पट्ट्यात कोंडीस सुरूवात झाली. माजिवडा, मानपाडापर्यंत ती होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी वाढली. परंतु,शनिवारी सलग दुसºया दिवशी पुन्हा याच मार्गावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर तसेच तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिक रोड, कळवानाका या भागांत वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. हे काम वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. परंतु, शनिवारी बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनीच पुन्हा तीच चूक केली. याची माहिती वाहतूक विभागाला मिळताच, ठेकेदारांना समज देऊन काम बंद केले. रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याचे ठरले असताना दिवसा खड्डे बुजवले जात असल्याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात येतील, असे स्पष्ट केले. शिवाय, जेएनपीटी आणि पालघरवरून येणारी अवजड वाहने ही पिकअवरलाच येत असल्याने त्यामुळेही कोंडी होत आहे. त्यासाठीसुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यांना भले मोठे खड्डे पडल्याने अन्य कारणांबरोबरच याही कारणास्तव मुंबईला येणारी व जाणारी वाहतूक मंदावली आहे. पावसाने उघडीप घेताच खड्डे बुजविण्याची एमएसआरडीसीला घाई झाली आहे. मात्र वाहने इतकी वाढली आहेत की दिवसा खड्डे भरणे हेच कोंडीचे कारण ठरले आहे.पालकमंत्र्यांविषयी संतापरस्ते विकास महामंडळाचा कार्यभार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्या शहरातच या विभागाच्या चुकीमुळे २४ लाख ठाणेकरांसह मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि राज्यातील इतर शहरांतून येणाºया लाखो रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात रुग्णांसह वृद्ध प्रवासी आणि वाहनचालकांचाही समावेश आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnewsबातम्या