शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाणेकरांचा दुसरा दिवसही वाहतूककोंडीत, ठेकेदारांमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:36 IST

ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती.

ठाणे - ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने कोंडीची तीव्रता वाढली. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. शनिवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याचे काम सुरूकेल्याने कोंडी झाली होती. मात्र, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे शुक्रवारी सांगणाºया वाहतूक पोलिसांनी शनिवारी ते दाखल न करता केवळ नोटिसा बजावल्या, असे सांगितले. वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेविषयी वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी सकाळीही घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. सकाळी ८ पासून घोडबंदर पट्ट्यात कोंडीस सुरूवात झाली. माजिवडा, मानपाडापर्यंत ती होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी वाढली. परंतु,शनिवारी सलग दुसºया दिवशी पुन्हा याच मार्गावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर तसेच तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिक रोड, कळवानाका या भागांत वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. हे काम वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. परंतु, शनिवारी बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनीच पुन्हा तीच चूक केली. याची माहिती वाहतूक विभागाला मिळताच, ठेकेदारांना समज देऊन काम बंद केले. रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याचे ठरले असताना दिवसा खड्डे बुजवले जात असल्याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात येतील, असे स्पष्ट केले. शिवाय, जेएनपीटी आणि पालघरवरून येणारी अवजड वाहने ही पिकअवरलाच येत असल्याने त्यामुळेही कोंडी होत आहे. त्यासाठीसुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यांना भले मोठे खड्डे पडल्याने अन्य कारणांबरोबरच याही कारणास्तव मुंबईला येणारी व जाणारी वाहतूक मंदावली आहे. पावसाने उघडीप घेताच खड्डे बुजविण्याची एमएसआरडीसीला घाई झाली आहे. मात्र वाहने इतकी वाढली आहेत की दिवसा खड्डे भरणे हेच कोंडीचे कारण ठरले आहे.पालकमंत्र्यांविषयी संतापरस्ते विकास महामंडळाचा कार्यभार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्या शहरातच या विभागाच्या चुकीमुळे २४ लाख ठाणेकरांसह मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि राज्यातील इतर शहरांतून येणाºया लाखो रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात रुग्णांसह वृद्ध प्रवासी आणि वाहनचालकांचाही समावेश आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnewsबातम्या