शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

ठाणेकरांचा दुसरा दिवसही वाहतूककोंडीत, ठेकेदारांमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:36 IST

ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती.

ठाणे - ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने कोंडीची तीव्रता वाढली. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. शनिवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याचे काम सुरूकेल्याने कोंडी झाली होती. मात्र, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे शुक्रवारी सांगणाºया वाहतूक पोलिसांनी शनिवारी ते दाखल न करता केवळ नोटिसा बजावल्या, असे सांगितले. वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेविषयी वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी सकाळीही घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. सकाळी ८ पासून घोडबंदर पट्ट्यात कोंडीस सुरूवात झाली. माजिवडा, मानपाडापर्यंत ती होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी वाढली. परंतु,शनिवारी सलग दुसºया दिवशी पुन्हा याच मार्गावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर तसेच तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिक रोड, कळवानाका या भागांत वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. हे काम वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. परंतु, शनिवारी बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनीच पुन्हा तीच चूक केली. याची माहिती वाहतूक विभागाला मिळताच, ठेकेदारांना समज देऊन काम बंद केले. रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याचे ठरले असताना दिवसा खड्डे बुजवले जात असल्याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात येतील, असे स्पष्ट केले. शिवाय, जेएनपीटी आणि पालघरवरून येणारी अवजड वाहने ही पिकअवरलाच येत असल्याने त्यामुळेही कोंडी होत आहे. त्यासाठीसुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यांना भले मोठे खड्डे पडल्याने अन्य कारणांबरोबरच याही कारणास्तव मुंबईला येणारी व जाणारी वाहतूक मंदावली आहे. पावसाने उघडीप घेताच खड्डे बुजविण्याची एमएसआरडीसीला घाई झाली आहे. मात्र वाहने इतकी वाढली आहेत की दिवसा खड्डे भरणे हेच कोंडीचे कारण ठरले आहे.पालकमंत्र्यांविषयी संतापरस्ते विकास महामंडळाचा कार्यभार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्या शहरातच या विभागाच्या चुकीमुळे २४ लाख ठाणेकरांसह मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि राज्यातील इतर शहरांतून येणाºया लाखो रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात रुग्णांसह वृद्ध प्रवासी आणि वाहनचालकांचाही समावेश आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnewsबातम्या