शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणेकरांना साध्या तिकिटातच गारेगार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:51 IST

जेएनएनयूआरएमच्या २०० बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत असतानाच आता ठाणेकरांना साध्या बसच्या तिकिटातच गारेगार अर्थात एसी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे : यात इथेनॉइलवर धावणाºया दोन बस डिसेंबरअखेर ताफ्यात दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाच इलेक्ट्रिक बसदेखील जानेवारीत म्हणजेच नव्या वर्षात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे.परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यामुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर मात करून ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्या रस्त्यावर धावणार असल्या तरी कोणताही खर्च न करता उलट पालिकेला महिनाकाठी १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आता या बससाठी आवश्यक असणारे चार्जिंग स्टेशन आनंदनगर जकातनाक्यावर उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यानुसार, नव्या वर्षात पहिल्या टप्प्यात पाच बस आनंदनगर ते घोडबंदर-गायमुख या मार्गावर धावणार आहेत. यामध्ये युरोपमध्ये ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बसधावत आहेत, त्यानुसारच ठाण्यातही त्याच पद्धतीचा अवलंब करून हीसेवा एका कंपनीकडून दिली जाणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबंधित एजन्सी वायफाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर काहीही उपलब्ध करून देणार आहे.दरम्यान, पर्यावरणपूरक पद्धतीच्या इथेनॉइलच्या ५० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात डिसेंबरअखेर २, त्यानंतर जानेवारीत पाच आणि मार्चपर्यंत उर्वरित बस दाखल होणार आहेत. त्या घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर सोडण्यात येणार आहेत.अनेक सुविधा देणारसध्या परिवहनच्या एसी बसेसचे तिकीटदर घोडबंदरपर्यंत ३५ रुपये आहे. साध्या बसचे दर २१ रुपये आहे. शिवाय, खाजगी बस १५ रुपये आणि शेअर रिक्षादेखील २५ ते ३० रुपये आकारतात.परंतु, इथेनॉइल बसचे तिकीट केवळ २५ रुपये असणार आहे. बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय, मोबाइल चार्जिंग, एलईडी आदींची सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. याच एलइडीवर जाहिराती करून पालिका त्यातून उत्पन्न घेणार आहे.

टॅग्स :thaneठाणे