शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

ठाणेकरांचा मुंबई प्रवेश महागला: टोलच्या दरांमध्ये ५ ते २५ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 10:10 PM

ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाऱ्या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या कामगारांच्या कपातीचे धोरण असल्यामुळे ही टोलवाढ सध्या लागू करु नये, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देवाहन चालकांमध्ये संतापवेतनकपात असूनही टोल वाढल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे अनेक खासगी कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांची कपात झाली आहे. तर अनेक ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. असे असतांनाही ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाºया टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी मुलूंड चेक नाका आनंदनगर येथे तसेच वागळे इस्टेट येथील मुलूंड चेक नाका येथे वाहन चालकांकडून टोल आकारला जातो. मुंबईमध्ये जाणाºया आणि मुंबईतून बाहेर पडणाºया वाहन चालकांकडून याठिकाणी टोल घेतला जातो. रस्ता दुरुस्ती आणि देखभाल करणाºया आयआरबी कंपनीकडे टोल आकारणीचा ठेका दिलेला आहे. या कंपनीला यापुढे टोल आकारणीमध्ये वाढ करण्याची मुभा राज्य सरकारने १ आॅक्टोंबरपासून दिली. त्यामुळे या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ झाली असून मासिक पासच्या रकमेतही वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच अनेक वस्तूंच्या किंमती त्यामुळे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अपुरे वेतन आणि नोकर कपातीमुळे नोकरदार मंडळी तर दुकाने वारंवार बंद राहण्यामुळे व्यापारी मंडळी हैराण आहेत. त्यातच या टोलवाढीमुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर टोलच्या वाढलेल्या दरांमुळे चालक आणि टोल वसूली करणारा कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोपरीतील आनंदनगर नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचेही गुरुवारी पहायला मिळाले. ठाणे मुंबई मार्गावर अनेक ठिकाणी खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातून होणाºया अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तर अनेकजण जायबंदी होत आहेत. अशा वेळी रस्ते दुरुस्ती करण्याऐवजी टोलमध्ये वाढीला राज्य शासनाने परवानगी देणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया अनेक चालकांनी व्यक्त केल्या आहेत.असे आहेत टोलचे नविन दर:* छोटी वाहने ३५ वरुन ४० रुपये* मध्यम अवजड वाहने ५५ ऐवजी ६५ रुपये* ट्रक आणि बसेस १०५ ऐवजी १३० रुपये* अवजड वाहने १३५ वरुन १६० रुपये* हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे.* पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रु पयांऐवजी १५०० रु पये झाला आहे. 

‘‘ राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दर तीन वर्षांनी होणारी ही टोल वाढ आहे. २०१२ मध्ये आधीच ठरलेल्या आधीसूचनेप्रमाणे ही टोलवाढ केली आहे. ’’जयंत म्हैसकर, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सस लि. मुंबई.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकtollplazaटोलनाका