शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:09 IST

पिसे बंधाऱ्याजवळ दुरुस्तीचे काम आणखी आठ दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा फटका आता ठाणेकरांना सोसावा लागणार आहे. पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देवॉल दुरुस्तीचे काम अद्यापही सुरुमहापालिका उचलते २०० दक्षलक्ष लीटर पाणी

ठाणे - शहरातील विविध भागात पाणी समस्येवरुन स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला असातांना आता पुढील आठवडाभर ठाणेकरांना पाण्याची झळ सोसावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्याजवळ दुरु स्तीचे काम सुरु असल्यामुळे मागील आठ दिवसांपासून ठाणेकरांनापाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात या दुरु स्तीचा कामासाठी आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे ठाकले आहे.                          बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळकुम, वर्तकनगर, कोपरी आणि दिव्यातील पाणी समस्येला स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाचा फोडली होती. परंतु आता पाणी समस्येचे ढग आता आणखी गडद होणार आहेत. ठाणे जिल्ह््यातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह््यातील सर्वच धरण काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात मुबलक पाणी असतानाही बंधारा दुरु स्तीच्या कामामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहीले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचे शहरात वितरण करते. या बंधाऱ्यातून मुंबई महापालिकेकडून दररोज दोन हजार दशलक्षलीटर तर ठाणे महापालिकेकडून २०० दशलक्षलीटर इतके पाणी घेते. ठाणे महापालिका विविध स्त्रोतांमार्फत पाणी घेऊन त्याचे शहरात वितरण करते. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेसाठी या बंधाऱ्यातून पाणी उचलते. गेल्या आठ दिवसांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यामुळे ठाणे महापलिकेला नदी पात्रातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकेकडून बंधाऱ्याच्या ‘बलुन वॉल’ची दुरु स्ती करण्यात येते. याच वॉलच्या दुरु स्तीचे काम मुंबई महापालिकेने सुरु केले असून या कामासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत. या दुरु स्तीच्या कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला असून यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपनगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी गुरूवारी पिसे बंधाऱ्याजवळील दुरु स्ती कामाची पाहाणी केली. या पाहाणी दरम्यान मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी