शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

ठाणेकरांना मिळणार ३०० चौरस फुटांचे घर, गृहनिर्माणमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:49 IST

ठाणेकरांनाही आता ३०० चौरस फुटांची घरे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’ला दिली.

अजित मांडके ठाणे : मुंबईतील एसआरएच्या धर्तीवर झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या ठाणेकरांनाही आता ३०० चौरस फुटांची घरे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय ठाणे, मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील घरांसाठीच्या नियम-अटींमध्ये समानता आणण्याचे धोरण लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस वसाहतींचा विकास करताना त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती येथे पोलिसांसाठी ५०० चौरस फुटांपर्यंत घर देण्याचा विचार शासनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस गृहनिर्माणासंदर्भातील धोरण राबविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या ठाण्यात एसआरए योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर मिळत आहे. त्यामुळे या योजनेला चालना मिळत नाही. मात्र, आता झोपडपट्ट्यांत वास्तव्य करणाºया ठाणेकरांनाही या योजनेचा लाभ मिळावा आणि हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. वास्तविक, दोन वर्षांपासून एसआरएच्या माध्यमातून मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील झोपडपट्ट्यांना नियम लागू करावेत. ३०० चौरस फुटांचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता नगरविकास व गृहनिर्माण ही बांधकाम क्षेत्राशी संबंधित दोन्ही खाती ठाण्यातील नेत्यांकडे आल्याने त्याला खºया अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचे आव्हाड यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.>एमएमआरए क्षेत्रासाठी समान धोरणमुंबई, ठाणे आणि एमएमआरए क्षेत्रामध्ये घरांची उभारणी, विक्री याबाबतच्या धोरणात समानता असावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. एफएसआयचा योग्य वापर कसा होऊ शकतो, याचाही विचार सुरू आहे. गृहनिर्माण धोरण राबवताना विकासकाबरोबरच सर्वसामान्यांचाही फायदा कसा होईल आणि त्यांना हक्काचे घर वाजवी दरात कसे उपलब्ध होईल, यासाठीचा अभ्यास शासनस्तरावर सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेला चालना देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी शासकीय भूखंडावर ही योजना कशी राबविता येईल आणि गरिबांना हक्काची घरे कशी मिळतील, यासाठी मोठी पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.