शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर जानेवारीपर्यंत शॉवरफुल!; लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:51 IST

पाणीटंचाईचे संकट तीन महिने लांबणीवर, जिल्हावासीयांना दिलासा

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सुरु होणारी १५ टक्के पाणीकपात यंदा होणार नाही. जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा भरपूर पाणीसाठा असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यानुसार पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागास मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिवाळी झाल्यावर लागलीच सर्व शहरांमध्ये पाणीकपात लागू होत होती. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जात होता. साहजिकच ज्या भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असायचा तेथील सोसायट्यांमध्ये रविवारी दुपारीच पाणी बंद केले जात होते. सोमवारी पाणी नसल्याने काटकसरीने वापरावे लागायचे. सोमवारी पाणी नसल्याने मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठ्यावर परिणाम असायचा. तात्पर्य हेच की, एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याची झळ त्या दिवसाच्या मागील व पुढील दिवसही जाणवायची. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू केल्यावर आठवड्यात सहा दिवस पाण्याची बोंब असायची व जेमतेम एक किंवा दोन दिवस तुलनेनी बºयापैकी पाणी मिळायचे. त्यामुळे शॉवर सोडाच बालदीभर पाणी मिळाले तरी नशिब, अशी ठाणेकरांची अवस्था असायची. यंदा या त्रासापासून नागरिकांना दिलासा लाभला आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण दाबाने मिळाला व फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये थोडीफार कपात लागू झाली तरी जेमतेम तीन महिने लोकांना कळ सोसावी लागेल. यंदा आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र लांबलेला पाऊस आणि बारवी धरणाची उंची वाढल्याने अतिरिक्त पाणीसाठा त्यामुळे पाण्याचा दिलासा लाभला.कळवा येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सर्व महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागांसह स्टेमघर, एमआयडीसी आदींची बैठक लघुपाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबर रोजी घेतली. मंजूर कोट्यानुसार पाणी उचलण्याची तंबी सर्वांना देण्यात आली. कोणीही जादा पाणी उचलण्याचा प्रयत्न करू नये. जानेवारीनंतर कपात करायची किंवा कसे, याविषयी निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट टळले आहे.जलपर्णी स्वच्छता केडीएमसीवरउल्हास नदीपात्रातून पाणी उचलणाºया स्टेमघरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला मात्र उल्हास नदीतील जलपर्णी साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या नदीपात्रात जलपर्णी होणार नाही, याची काळजी घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. पाणी उचलण्याच्या ठिकाणी स्टेमघर व केडीएमसीने जलपर्णी होऊ न देण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत.बारवीत मुबलक पाणीसाठा : बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून जानेवारीनंतर पाणीपुरवठ्याच्या कमीअधिक प्रमाणाचा विचार करण्यावर मात्र सर्वांचे एक मत झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील लोकसंख्या वाढत असून बेकायदा इमारती, चाळी यामुळे पाण्याची समस्या नेहमीच भेडसावते. नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांत या परिसरात दरवर्षी पाणीटंचाईचे संकट असल्याने अनेक वसाहतींमध्ये पाण्याकरिता वादावादी, भांडणे इतकेच काय हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका