शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ठाणेकर जानेवारीपर्यंत शॉवरफुल!; लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:51 IST

पाणीटंचाईचे संकट तीन महिने लांबणीवर, जिल्हावासीयांना दिलासा

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सुरु होणारी १५ टक्के पाणीकपात यंदा होणार नाही. जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा भरपूर पाणीसाठा असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यानुसार पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागास मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिवाळी झाल्यावर लागलीच सर्व शहरांमध्ये पाणीकपात लागू होत होती. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जात होता. साहजिकच ज्या भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असायचा तेथील सोसायट्यांमध्ये रविवारी दुपारीच पाणी बंद केले जात होते. सोमवारी पाणी नसल्याने काटकसरीने वापरावे लागायचे. सोमवारी पाणी नसल्याने मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठ्यावर परिणाम असायचा. तात्पर्य हेच की, एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याची झळ त्या दिवसाच्या मागील व पुढील दिवसही जाणवायची. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू केल्यावर आठवड्यात सहा दिवस पाण्याची बोंब असायची व जेमतेम एक किंवा दोन दिवस तुलनेनी बºयापैकी पाणी मिळायचे. त्यामुळे शॉवर सोडाच बालदीभर पाणी मिळाले तरी नशिब, अशी ठाणेकरांची अवस्था असायची. यंदा या त्रासापासून नागरिकांना दिलासा लाभला आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण दाबाने मिळाला व फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये थोडीफार कपात लागू झाली तरी जेमतेम तीन महिने लोकांना कळ सोसावी लागेल. यंदा आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र लांबलेला पाऊस आणि बारवी धरणाची उंची वाढल्याने अतिरिक्त पाणीसाठा त्यामुळे पाण्याचा दिलासा लाभला.कळवा येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सर्व महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागांसह स्टेमघर, एमआयडीसी आदींची बैठक लघुपाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबर रोजी घेतली. मंजूर कोट्यानुसार पाणी उचलण्याची तंबी सर्वांना देण्यात आली. कोणीही जादा पाणी उचलण्याचा प्रयत्न करू नये. जानेवारीनंतर कपात करायची किंवा कसे, याविषयी निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट टळले आहे.जलपर्णी स्वच्छता केडीएमसीवरउल्हास नदीपात्रातून पाणी उचलणाºया स्टेमघरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला मात्र उल्हास नदीतील जलपर्णी साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या नदीपात्रात जलपर्णी होणार नाही, याची काळजी घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. पाणी उचलण्याच्या ठिकाणी स्टेमघर व केडीएमसीने जलपर्णी होऊ न देण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत.बारवीत मुबलक पाणीसाठा : बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून जानेवारीनंतर पाणीपुरवठ्याच्या कमीअधिक प्रमाणाचा विचार करण्यावर मात्र सर्वांचे एक मत झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील लोकसंख्या वाढत असून बेकायदा इमारती, चाळी यामुळे पाण्याची समस्या नेहमीच भेडसावते. नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांत या परिसरात दरवर्षी पाणीटंचाईचे संकट असल्याने अनेक वसाहतींमध्ये पाण्याकरिता वादावादी, भांडणे इतकेच काय हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका