शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

 दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:26 IST

वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे : वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर तहानलेल्या भागातील नगरसेवकांनी अद्यापही पाणीटंचाई सुटली नसल्याचे म्हटले आहे.घोडबंदरच्या वाढत्या गृहसुंकलांना पाणी देण्याच्या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले होते. पण २०४० पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे लेखी पत्र पालिकेने सादर केल्यानंतर न्यायालयाने बांधकामबंदी उठविली. नंतर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्येवरुन महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले होते. दिवाळीत तरी ठाणेकरांना पाणी मिळेल का? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला होता. परंतु, आहे. त्यानुसार घोडबंदर भागाला ८० ऐवजी ८१ एमएलडी म्हणजेच एक एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा, इंदिरानगर, वागळे येथे ५२ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा आणि सिद्धेश्वरवरून २८ पैकी २८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर कळवा, मुंब्य्रातही तो सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आणि दिवाळीत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आजही पाण्याची समस्या कायम असल्याचे मत राष्टÑवादीचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मांडले.वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे आणि पिसे येथे वीज पडल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.पिसे येथील समस्या शुक्रवारी सुटल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केल्याने तो प्रश्नही निकाली निघाला.

टॅग्स :Waterपाणी