शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
4
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
5
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
6
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
7
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
8
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
9
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
10
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
11
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
12
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
13
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
14
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
15
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
16
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
17
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
18
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
19
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
20
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Daily Top 2Weekly Top 5

लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 19:19 IST

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ...

ठळक मुद्दे तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधलेजिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ग्राम पंचायत विभागाव्दारे जिल्ह्यातील नदी, नाले, ओवळ आदींवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात लोकचळवळ ठरला आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव घेऊन सीईओंसह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावखे्यांसाठी नवसंजीवनी ठरलेला हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.        जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाऱ्यांचे कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांच्या नियंत्रणात ग्राम पंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी हाती घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी,                          कर्मचाऱ्यांरी आपल्या गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली.          या वनराई बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे उत्पन्न घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय विहितील पाण्याची साठवण क्षेमता वाढण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. जंगलातील माळरानावरील पशूपक्ष, गायी, म्हशी, आदी जनावराच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणी टंचाईचा काळ पुढे गेला आहे. वाहून जाणाऱ्यां या पाण्याचा वनराई बंधाऱ्यांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय यासाठी कोणताही निधी खर्च झाला नाही. यासाठी लागलेल्या काही लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्याही महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत. त्यातून गावखेड्यांना पाणी समस्यापासून नवसंजीवनी देणाऱ्यां या वनराई बंधाºयांचा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी देखील जिल्हा परिषद राज्य शासनाकडे आग्रही धरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद