शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 19:19 IST

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ...

ठळक मुद्दे तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधलेजिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ग्राम पंचायत विभागाव्दारे जिल्ह्यातील नदी, नाले, ओवळ आदींवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात लोकचळवळ ठरला आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव घेऊन सीईओंसह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावखे्यांसाठी नवसंजीवनी ठरलेला हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.        जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाऱ्यांचे कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांच्या नियंत्रणात ग्राम पंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी हाती घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी,                          कर्मचाऱ्यांरी आपल्या गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली.          या वनराई बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे उत्पन्न घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय विहितील पाण्याची साठवण क्षेमता वाढण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. जंगलातील माळरानावरील पशूपक्ष, गायी, म्हशी, आदी जनावराच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणी टंचाईचा काळ पुढे गेला आहे. वाहून जाणाऱ्यां या पाण्याचा वनराई बंधाऱ्यांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय यासाठी कोणताही निधी खर्च झाला नाही. यासाठी लागलेल्या काही लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्याही महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत. त्यातून गावखेड्यांना पाणी समस्यापासून नवसंजीवनी देणाऱ्यां या वनराई बंधाºयांचा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी देखील जिल्हा परिषद राज्य शासनाकडे आग्रही धरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद