शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 19:19 IST

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ...

ठळक मुद्दे तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधलेजिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ग्राम पंचायत विभागाव्दारे जिल्ह्यातील नदी, नाले, ओवळ आदींवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात लोकचळवळ ठरला आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव घेऊन सीईओंसह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावखे्यांसाठी नवसंजीवनी ठरलेला हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.        जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाऱ्यांचे कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांच्या नियंत्रणात ग्राम पंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी हाती घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी,                          कर्मचाऱ्यांरी आपल्या गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली.          या वनराई बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे उत्पन्न घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय विहितील पाण्याची साठवण क्षेमता वाढण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. जंगलातील माळरानावरील पशूपक्ष, गायी, म्हशी, आदी जनावराच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणी टंचाईचा काळ पुढे गेला आहे. वाहून जाणाऱ्यां या पाण्याचा वनराई बंधाऱ्यांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय यासाठी कोणताही निधी खर्च झाला नाही. यासाठी लागलेल्या काही लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्याही महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत. त्यातून गावखेड्यांना पाणी समस्यापासून नवसंजीवनी देणाऱ्यां या वनराई बंधाºयांचा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी देखील जिल्हा परिषद राज्य शासनाकडे आग्रही धरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद