शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाणेच शिवसेनेची एकहाती सत्ता आणेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:57 IST

शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ठाणे जिल्हा परिषदेत प्रथमच शिवसेनेची सत्ता आली.

ठाणे : शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ठाणे जिल्हा परिषदेत प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सेनेची एकहाती सत्ता येईल व त्यामध्ये ठाण्याची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नवनियुक्त नेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला.शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या वतीने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते. शाखाप्रमुख ते शिवसेना नेतेपदापर्यंतच्या प्रवासातील खाचखळगे, अनुभव, संघटनेकरिता केलेले कष्ट, अन्य पक्षांतील नगरसेवकांची फोडाफोडी हा सारा पट शिवसैनिकांसमोर त्यांनी उलगडून दाखवला.ठाण्यातील आतापर्यंतच्या यशाचे मानकरी शिवसैनिक असल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी हा सन्मान अर्पण करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे नेतेपदाचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाला. धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना व ठाणे हे नाते गेल्या अनेक वर्षांपासून तयार झाले.शिवसेनाप्रमुखांनी दिलेला प्रत्येक आदेश स्व. दिघे यांनी पाळला. त्यांनी केलेले काम टिकवण्याचे काम आपण करतोय.ठाण्यातील शिवसेनावाढीचे काम त्यांनीच केले. एकटा एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही, असे ते म्हणाले.>अखेर स्थापनेनंतर ५३ वर्षांनी जि.प.वर शिवसेनेचा भगवाशिवसेना एकीकडे आणि इतर सर्व पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती एका निवडणुकीच्या वेळी निर्माण झाली होती. अगदी महापौरांपासून सर्व पदे त्या पक्षांनी आपापसात वाटून घेतली होती. मोठ्या मुत्सद्देगिरीने एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दोन नगरसेवकांना फोडण्यात यश आले आणि विजय खेचून आणला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या असामींच्या नजरा लागल्या होत्या. काही जण महाबळेश्वर येथून थेट गुजरातला जाणार होते. पण, जि.प. अध्यक्षपद खेचून आणले. जि.प.वर सत्ता आणण्याचे आनंद दिघे यांचे स्वप्न साकार झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही या निवडणुकीबाबत विचारणा होत होती. अखेर, शिवसेनेच्या स्थापनेनंतर ५३ वर्षांनी जि.प.वर शिवसेनेचा भगवा फडकला.>मातोश्रीचा हात पाठीशीशिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे त्याच्या अडचणींना धावून जा, असा सल्ला त्यांनी पदाधिकाºयांना दिला. अनेक संकटे आली, टीकाही झाली पण ‘मातोश्री’चा अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांचा हात पाठीशी असल्यामुळे आपण खंबीर राहिलो, असे शिंदे म्हणाले.>प्रतिकूल परिस्थितीतही तेल, साखर, रॉकेलटंचाई विरुद्ध कसा लढा दिला, याचे स्मरण त्यांनी करून दिले. ट्रकचालकांच्या संपात पाच लाखांची रोकड देऊन १२ ट्रक भरून साखर ठाण्यात आणली होती. ती रोकड सोबत नेताना वारंवार न्याहाळत होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे