शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

ठाण्याची होणार कचराकोंडी

By admin | Updated: February 4, 2016 02:35 IST

डायघर येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा असलेला विरोध, तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा खर्च आवाक्याबाहेर, शीळ येथील कचरापट्टीची जागा ताब्यात आलेली नाही

अजित मांडके,  ठाणेडायघर येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा असलेला विरोध, तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा खर्च आवाक्याबाहेर, शीळ येथील कचरापट्टीची जागा ताब्यात आलेली नाही, घोडबंदरच्या खाडीकिनारी कचरा टाकण्यास बंदी आणि वागळे इस्टेट येथे दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस कचरा टाकता येणार नाही हे वास्तव, अशी सर्व बाजूंनी ठाणे महापालिकेची कोंडी झालेली आहे. दिवा येथील क्षेपणभूमीत कचरा टाकण्यास न्यायालयाने बंदी केल्यावर अन्य कुठलाच पर्याय समोर दिसत नसल्याने ठाण्यात ‘कचराकोंडी’ होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.ठाणे महापालिकेने कचरा टाकण्याकरिता स्वत:ची स्वतंत्र सोय केली नाही तर केडीएमसीत नवीन बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली, तशी ती येथेही नाकारण्यात येईल, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत, आठवडाभरात महापालिकेला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. त्यामुळे ठाण्यातील २० लाख लोकांकडून दररोज निर्माण होणारा ७०० मेट्रीक टन कचरा कुठे फेकायचा, असा प्रश्न आयुक्त संजीव जयस्वाल यांना पडला आहे.शीळची जागा ताब्यात नाही : शीळ भागात वन विभागाची जागा आहे. ही जागा कचरा टाकण्याकरिता ताब्यात घेण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, मागील एक वर्षापासून विविध स्वरूपांच्या परवानग्या घेताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहे. ही जागा जरी ताब्यात आली असती तर किमान नवीन जागेचा पर्याय मिळेपर्यंत काही महिने या जागेने तारले असते, असा सूर पालिकेचे अधिकारी लावू लागले आहेत. परंतु, ही जागादेखील ताब्यात नाही. त्यातच, घोडबंदर येथील खाडीकिनारी कचरा टाकण्यास मज्जाव असल्याने हा पर्यायदेखील बंद झाला आहे. दिवा येथील क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास आठवडाभरात मज्जाव करण्यात आला तर वागळे येथील वाहतुकीच्या जागेवर जो कचरा दररोज जमा केला जातो, त्या ठिकाणी कचरा टाकत राहण्याचा पालिकेपुढे पर्याय आहे. परंतु, येथील जागेची दोन ते तीन दिवसांची क्षमता असल्याने त्यानंतर हा कचरा कुठे नेऊन टाकायचा, असा पालिकेपुढील पेच आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेने असाच प्रयत्न केला होता. परंतु, स्थानिक नागरिकांनी आणि उद्योजकांनी विरोध केल्याने पालिकेला माघार घ्यावी लागली होती. तळोजाची सामायिक भरावभूमी खर्चिकतळोजा येथील सामायिक भरावभूमीत अन्य महापालिकांसोबत सहभागी होण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. येथील सामायिक भरावभूमीत पालिकेला याच प्रतिटन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता ८३२ रुपये मोजावे लागणार होते. त्यामुळे खर्चाचा वाढीव बोजा हा पालिकेच्या खांद्यावर अधिक वाढत असल्याने पालिकेने याचा विचार सोडून दिला होता. परंतु, आता पालिकेने या भरावभूमीत सहभागी होण्यासाठी एमएमआरडीएच्या सर्वच अटी मान्य केल्या आहेत. यासंदर्भात दोनच दिवसांपूर्वी त्याची सहमती दर्शविल्याचे एमएमआरडीएला सांगण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, अन्य महापालिकांचा सहभाग असल्याखेरीज हा प्रकल्प मार्गी लागणार नाही.