शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यालाही बसणार पाणी कपातीचा फटका; पाऊस सुरु होत नाही तोपर्यंत MIDCकडून पाणी कपात लागू

By अजित मांडके | Updated: May 31, 2023 17:38 IST

त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा १४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा परिणाम ठाण्यातील काही भागांना पुढील काळात म्हणजेच पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपतीचा सामना करावा लागणार आहे.  त्यानुसार आता पहिले शटडाऊन येत्या २ जून रोजी घेण्यात आले आहे. त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाणी कपात लागू केली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील काही महत्वाच्या भागांना बसणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ठाणे शहरात मार्च पासूनच देखभाल दुरुस्ती असेल किंवा इतर तांत्रिक कामांसाठी वारंवार पाणी कपात करण्यास सुरवात झाली आहे. परंतु ही कपात नसून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता मात्र ठाण्यातील काही महत्वाच्या भागांना पाणी कपातीचे चटके सहन करावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून महिन्यातून १५ दिवसांनी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागांना त्याचा फटका बसणार आहे. एमआयडीसीकडून ठाण्याला रोज १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता कपात लागू करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, दिवा या भागांना बसणार आहे. विशेष म्हणजे दिव्यात तर यापूर्वीच पाणी संकट ओढावल्याचे दिसून आले आहे. येथील अनेक भागांना आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अनेक भागांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यात आता पाणी कपात लागू करण्यात आल्याने त्याचा आणखी त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. त्या खालोखाल मुंब्रा आणि कळवा देखील आहे. तसेच घोडबंदर पट्यातील कोलशेत, खालचा गाव, वागळे पट्यातील काही भागांना देखील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यातही ही पाणी कपात जो पर्यंत पावसाळा योग्यरित्या सुरु होत नाही, तो पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता पाणी कपात पाऊस चांगला झाल्यावरच रद्द होईल असे चित्र आहे. एकूणच त्याचा परिणाम आता ठाण्यातील महत्वाच्या भागांना देखील बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसी