शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

ठाण्यालाही बसणार पाणी कपातीचा फटका; पाऊस सुरु होत नाही तोपर्यंत MIDCकडून पाणी कपात लागू

By अजित मांडके | Updated: May 31, 2023 17:38 IST

त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा १४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा परिणाम ठाण्यातील काही भागांना पुढील काळात म्हणजेच पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपतीचा सामना करावा लागणार आहे.  त्यानुसार आता पहिले शटडाऊन येत्या २ जून रोजी घेण्यात आले आहे. त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाणी कपात लागू केली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील काही महत्वाच्या भागांना बसणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ठाणे शहरात मार्च पासूनच देखभाल दुरुस्ती असेल किंवा इतर तांत्रिक कामांसाठी वारंवार पाणी कपात करण्यास सुरवात झाली आहे. परंतु ही कपात नसून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता मात्र ठाण्यातील काही महत्वाच्या भागांना पाणी कपातीचे चटके सहन करावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून महिन्यातून १५ दिवसांनी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागांना त्याचा फटका बसणार आहे. एमआयडीसीकडून ठाण्याला रोज १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता कपात लागू करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, दिवा या भागांना बसणार आहे. विशेष म्हणजे दिव्यात तर यापूर्वीच पाणी संकट ओढावल्याचे दिसून आले आहे. येथील अनेक भागांना आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अनेक भागांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यात आता पाणी कपात लागू करण्यात आल्याने त्याचा आणखी त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. त्या खालोखाल मुंब्रा आणि कळवा देखील आहे. तसेच घोडबंदर पट्यातील कोलशेत, खालचा गाव, वागळे पट्यातील काही भागांना देखील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यातही ही पाणी कपात जो पर्यंत पावसाळा योग्यरित्या सुरु होत नाही, तो पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता पाणी कपात पाऊस चांगला झाल्यावरच रद्द होईल असे चित्र आहे. एकूणच त्याचा परिणाम आता ठाण्यातील महत्वाच्या भागांना देखील बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसी