शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

ठाण्यालाही बसणार पाणी कपातीचा फटका; पाऊस सुरु होत नाही तोपर्यंत MIDCकडून पाणी कपात लागू

By अजित मांडके | Updated: May 31, 2023 17:38 IST

त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा १४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा परिणाम ठाण्यातील काही भागांना पुढील काळात म्हणजेच पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपतीचा सामना करावा लागणार आहे.  त्यानुसार आता पहिले शटडाऊन येत्या २ जून रोजी घेण्यात आले आहे. त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाणी कपात लागू केली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील काही महत्वाच्या भागांना बसणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ठाणे शहरात मार्च पासूनच देखभाल दुरुस्ती असेल किंवा इतर तांत्रिक कामांसाठी वारंवार पाणी कपात करण्यास सुरवात झाली आहे. परंतु ही कपात नसून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता मात्र ठाण्यातील काही महत्वाच्या भागांना पाणी कपातीचे चटके सहन करावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून महिन्यातून १५ दिवसांनी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागांना त्याचा फटका बसणार आहे. एमआयडीसीकडून ठाण्याला रोज १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता कपात लागू करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, दिवा या भागांना बसणार आहे. विशेष म्हणजे दिव्यात तर यापूर्वीच पाणी संकट ओढावल्याचे दिसून आले आहे. येथील अनेक भागांना आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अनेक भागांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यात आता पाणी कपात लागू करण्यात आल्याने त्याचा आणखी त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. त्या खालोखाल मुंब्रा आणि कळवा देखील आहे. तसेच घोडबंदर पट्यातील कोलशेत, खालचा गाव, वागळे पट्यातील काही भागांना देखील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यातही ही पाणी कपात जो पर्यंत पावसाळा योग्यरित्या सुरु होत नाही, तो पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता पाणी कपात पाऊस चांगला झाल्यावरच रद्द होईल असे चित्र आहे. एकूणच त्याचा परिणाम आता ठाण्यातील महत्वाच्या भागांना देखील बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसी