शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाहतूक कोंडीत अडकले ठाणे, सकाळी खड्डे बुजवणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:19 IST

ठाणे : वाहतूक पोलिसांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने घोडबंदरपट्ट्यात शुक्र वारी सकाळी ८ पासूनच वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार ते पाच तास कोंडी कायम होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंतची वेळ दिली असतानाही या नियमांचे पालन ठेकेदारांकडून होत ...

ठाणे : वाहतूक पोलिसांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने घोडबंदरपट्ट्यात शुक्र वारी सकाळी ८ पासूनच वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार ते पाच तास कोंडी कायम होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंतची वेळ दिली असतानाही या नियमांचे पालन ठेकेदारांकडून होत नसल्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे सर्व ठेकेदारांना वाहतूक विभागाने नोटिसा दिल्या. यापुढे हा नियम न पाळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची तंबीही ठेकेदारांना देण्यात आली आहे. दुसरीकडे माजिवडा येथे सुरू असलेले मेट्रोचे आणि मुंब्रा बायपासचे काम सुरू होण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अध्यादेशाचे पालन अवजड वाहनांकडून होत नसल्याने घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडी होत आहे.शुक्र वारी सकाळीच घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. सकाळी ८ वाजतापासून घोडबंदर पट्ट्यात माजिवडा, मानपाडापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. रेल्वे मोटारमनच्या आंदोलनामुळे रेल्वेसेवेवर अवलंबून न राहता नागरिकांनी शुक्रवारी आपल्या वाहनांनी जाणेच पसंत केले. मात्र, वाहतूककोंडी होण्याचे हे एकमेव कारण नसून, पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा वाहतूक पोलिसांची मदत न घेता एमएसआरडीसीच्या ठेकेदारांनी या भागात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी झाली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. खड्डे बुजवण्यासाठी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंतची वेळ दिली असतानाही ठेकेदारांनी सकाळच्या वेळेस ते काम सुरू केले. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये खड्डे बुजवण्यासाठी वेळ निश्चित केली असतानाही ठेकेदारांकडून ही वेळ पाळली गेली नाही. सकाळी वाहतूककोंडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम थांबवण्यात आले. सर्व ठेकेदारांना वाहतूक विभागाने नोटिसा दिल्या असून यानंतर जर निर्धारित वेळेत खड्डे बुजवले नाही, तर अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. कोणतेही काम करताना संबंधित एजन्सीने वाहतूक पोलिसांना सूचना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>ठाण्यासह परिसरातील महामार्गांवरील वाहतूककोेंडीमुळे प्रवाशांनी आपला मोर्चा रेल्वेकडे वळविला होता. त्यामुळेदुपारनंतर लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली होती.मोटरमनच्या आंदोलनामुळे लोकलसेवा अगोदरच विस्कळीत झाली असताना वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गर्दी लोकलवर वाढली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये गर्दी जास्त होती. ठाणे स्थानकात प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीतील प्रवाशांनी दरवाजे न उघडल्यामुळे फलाटावरील काहींनी ती अडवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचा उद्रेक बघून रेल्वे प्रशासनाने त्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बसण्यास परवानगी दिली.>मुंब्रा बायपासचे काम सुरू होण्यापूर्वी शहरात या कामादरम्यान वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई आणि पालघरकडून वाहनांना शहरात येण्यासाठी विशिष्ट वेळ देण्यात आली होती. ही वाहने वेळ पाळली जात नसल्याने वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे काळे यांनी सांगितले. याशिवाय, तत्त्वज्ञान विद्यापीठ नाक्यावर मेट्रोसाठी बॅरिकेड्स टाकण्यात आल्यानेही काही प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांनी कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे