शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Thane: उत्तर प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यतील फरार दोन आरोपी सात वर्षानंतर अटकेत

By अजित मांडके | Updated: August 17, 2024 16:22 IST

Thane News: उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येक ५० हजार रुपये बक्षीस घोषीत केलेल्या खुन्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना सात वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ प्रयागराज उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे.

- अजित मांडके  ठाणे - उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येक ५० हजार रुपये बक्षीस घोषीत केलेल्या खुन्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना सात वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ प्रयागराज उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. मोनु शुक्ला (३०) आणि रजत शुक्ला (२६) यांना अटक  करण्यात आले आहे.

या दोघांच्या विरुध्द उत्तर प्रदेश सरकाराने प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस लावले होते. हे दोघे आरोपी ठाण्यातील वसंत विहार परिसरात लपुन राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या कामी ठाणे पोलीसांची मदत मागितली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एसटीएफ उत्तर प्रदेश यांच्याकडे नमुद आरोपींची इंत्यभुत माहिती मिळवून त्यांचे मोबाइल नंबर मिळवून त्याचे सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले असता हे आरोपी निळकंठ वुड्स, मुल्ला बाग ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला ते दोघेही या भागात संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आले. त्यांना या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी आपली नावे व पत्ता देखील सांगितला. त्यानंतर उत्तर प्रदेश मधील शंकर शुक्ला यांच्या खुन्यात गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली.

दरम्यान या दोघांना १६ आॅगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता ताब्यात घेण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी एसटीएफ, प्रयागराज पोलीस उत्तरप्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी