शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मान्यवरांनी उलगडला ठाण्याचा प्रवास

By admin | Updated: October 14, 2015 02:37 IST

लोकमत काहीतरी कर ठाणेकर अंतर्गत ‘ठाणे काल आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी येथे आयोजन केले होते.

ठाणे : लोकमत काहीतरी कर ठाणेकर अंतर्गत ‘ठाणे काल आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी येथे आयोजन केले होते. यावेळी टीपटॉप प्लाझा चे संस्थापक रोहित शहा, ज्येष्ठ बांधकाम उद्योजक मुकुंद नातू, वास्तूतज्ज्ञ रविराज अहिरराव, सिनेदिग्दर्शक विजू माने, युवा पिढीचा लेखक सुदीप नगरकर आदी मान्यवर या परिसंवादाला उपस्थित होते. विघ्नेश जोशी यांनी या मान्यवरांना त्यांच्या खुमासदार शैलीतून बोलते केले. जुन्या ठाणे शहराचा बदलता चेहरा या सर्वच मान्यवरांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे मनात कुठलीही आढी न ठेवता ठाणे शहराविषयी सर्वच मान्यवर यावेळी भरभरून बोलत होते.ठाण्यामध्ये प्रथम जीन्स विकणाऱ्या रोहितभाई शहा यांनी ठाण्याला टीपटॉप बनविण्यासाठी पुढाकार घेतला. मॉन्जिनीस केक आणण्यासाठी ठाणेकरांना पूर्वी मुंबई गाठावी लागत असे हे लक्षात येताच त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मॉन्जिनीस केकचे दुकान सुरू केले. तसेच ठाण्यातील नागरिकांना ताज्या माव्याची मिठाई खाता यावी यासाठी टिपटॉप मिठाईचे दुकान आणि त्यानंतर टिपटॉप प्लाझा हॉटेल सुरू केले. आतापर्यंत ३ ते ४ हजार ठाणेकर टीपटॉप प्लाझा येथील हॉलमध्ये लग्नबेडीत अडकल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ठाण्यातील सर्व युवा पिढीला एकत्र करून व्यवसायाचे धडे देणे गरजेचे आहे. क्राफ्ट व्हिलेज तयार करण्याची माझी संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतने राबिवलेला काहीतरी कर ठाणेकर हा उपक्रम चांगला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. -रोहितभाई शहा (टिपटॉप प्लाझा)ठाण्यामध्ये बाल्कनीची संकल्पना प्रथम मांडली आणि ठाणेकरांनी ती आपलीशी केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला. इमारत बांधतांना प्रकल्पामध्ये कुठलीही नवीन संकल्पना आणली तरीही ठाणेकर त्याला प्रतिसाद देतात. त्यामुळे ठाणेकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांच्या उद्योगाचा आलेख सतत चढता राहिला. प्रत्येक वसाहत परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करेन. तसेच लोकमतने राबविलेल्याल्या काहीतरी कर ठाणेकर यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचेही यावेळी त्यांनी कबूल केले. - मुकूंद नातू (ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक)ठाणे हे वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अतिशय संपन्न असे शहर आहे या शहराला पूर्वीपासूनच तलाव समृद्धी लाभली आहे. या तलावात कारंजे असेल तर अधिक फायदेशीर असते. वास्तूच्या दृष्टीने भरभराट होते. त्यामुळे महापालिकेने तालवात कारंजे उभारण्याची सोय करावी असे त्यांनी सांगितले. सध्याचे युग हे बदलांचे युग आहे. त्यामुळे स्वत: पासून बदल करणे खुप गरजेचे आहे. स्मार्ट सिटीच व्हिजन खूप वेग घेत आहे. विकासाची सुरूवात आपल्यापासूनच व्हावी, तसेच सिंगापूर सारखे आॅटो डेबिट कार्ड टोल नाके बांधणे गरजेच आहे. - रविराज अहिरराव (ज्येष्ठ वास्तूशास्त्रज्ञ)