शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

ठाणे परिवहनचे प्रवासी घटले, मात्र अपघातांत झाली दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:22 IST

ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून तुलनेने अपघात मात्र दुपटीने वाढले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिवहनकडे दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. या वर्षभरात २१ अपघात घडले होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एक लाख ७६ हजार ६८३ इतकी प्रवासीसंख्या असून या वर्षभरात ५८ अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात अपघातात वाढ झाली असून प्रवाशांच्या संख्येत मात्र ६० हजारांची घट झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे महापालिकेचा महत्त्वाचा घटक असलेली परिवहन सेवा अर्थात टीएमटी १९८९ साली सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात एकूण ४७७ बस असून त्यापैकी २७० बस दररोज १०२ मार्गांवर धावतात. यातील बहुतांश बस कंत्राटी असून यात नव्याने दाखल झालेल्या १० तेजस्विनी बसचा समावेश आहे. कुठलेही वेळापत्रक नसलेल्या टीएमटीचा प्रवास रडतपडत सुरू असल्याने प्रवासीवर्गातून तक्रारी येत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्येत दोन वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढत असतानाही २०१६-१७ मध्ये प्रवासीसंख्या एक लाख ८२ हजार २५६ होती. २०१७-१८ या वर्षी दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. यंदा लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली असतानाही २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्या घटून एक लाख ७६ हजार ६८३ इतकी असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, शहरातील रस्त्यांचे रु ंदीकरण आणि काँक्रि टीकरण होण्यासह अनेक नवीन मार्ग निर्माण झाले असतानाही मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बस अपघातांमध्ये वाढ झाल्याची कबुली स्वत: परिवहन सेवेने दिली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या लेखी २०१६-१७ या वर्षात २८ अपघात घडले असून त्यामुळे दोघांचा मृत्यू ओढवला होता. २०१७-१८ मध्ये २१ अपघात घडले असून २०१८-१९ मध्ये दुपटीहून अधिक म्हणजेच ५८ अपघात घडले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका