शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 09:44 IST

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या कायम...

ठाणे : ठाणे आणि वाहतूक कोंडी हे न उलगडणारे कोडे बनले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि कोंडी नित्याचीच झालेल्या ठाणेकरांची पावसाळ्यात आणखी हालत खराब झाली आहे. कोंडीत तासनतास अडकून रहावे लागत असल्याने त्यांची कामे खोळंबत आहेत. नोकरदारांना लेटमार्क रोजचाच झाला असून चार दिवसांपासूनची ही कोंडी शनिवारी पाचव्या दिवशीही कायम असल्याचे चित्र ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात दिसले. 

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम असताना गुरुवारी रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे. खड्डे बुजविल्यानंतर कोंडी फुटेल, असे वाटत असतानाच सलग पाचव्या दिवशी वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.   

शुक्रवारी सांयकाळी वाहतूक कोंडी काहीशी कमी झाल्याचे दिसल्याने आता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे वाटत होते. मात्र शनिवारची सकाळही वाहतूक कोंडीचीच ठरली. त्यातही शासकीय तसेच इतर काही कार्यालयांना सुट्टी असल्याने खासगी वाहनांची रेलचेल काहीशी कमी दिसली. वाहनांची संख्या कमी असली, तरी भिवंडी ते कापूरबावडीपर्यंत अन्य लहान-मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसले. अनेक वाहने एकाच ठिकाणी २० ते २५ मिनिटे थांबून होती. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली. ही कोंडी नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर नाही, तर ठाण्याच्या मार्गावर झाल्याने ठाणेकरांनाच मनस्ताप सहन करावा लागला.   

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या दुपारनंतर वाहतूक काहीशी हळूहळू का होईना पुढे सरकत असल्याचे चित्र दिसून आले, मात्र रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपायोजना करून रोजच्या या जाचातून सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

दरम्यान गुरुवारी रात्रीपासून भिवंडी, साकेत मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु त्यानंतरही वाहतूक कोंडी कायम असल्याने या कोंडी मागचे नेमके कारण काय आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोंडीमुळे चालक सध्या त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी