शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 9, 2023 20:44 IST

Thane: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती.

- जितेंद्र कालेकरठाणे - आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात रसिक, नितीन आणि अनिल या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेन्यायालयाने फेटाळल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

या अपहरण आणि मारहाण प्रकरणी रसिक, नितीन आणि अनिल यांच्यासह पाच जणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल वर्तकनगर पोलीस ठाण्यात २५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील तक्रारदार बिपीन यांना २२ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कॅडबरी कपंनीजवळील सायकल स्टॅन्ड येथून रसिक बोरीचा यांनी संगनमत करुन एका मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवून येऊर येथील बंगल्यावर नेले होते.

त्यानंतर बिपीन यांचा शर्ट व पँट जबरदस्तीने काढून बोरीचा यांच्यासह पाच जणांनी शिवीगाळ करीत लाकडी बांबू तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे तसेच ठार मारण्याची धमकी देऊन त्यांची मोटार स्वत:कडे ठेवून घेतल्याचे बिपीन यांनी आपल्य तक्रारीमध्ये म्हटले होते. यातील आरोपींचा शोध सुरु असतांनाच त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय