शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

ठाणे : होळीपूर्वीच उन्हाळा ! आरोग्य सांभाळा : तापमान ४० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:54 IST

साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर शहापूर तालुक्यात पाºयाने चाळीशी गाठली.

ठाणे : साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर शहापूर तालुक्यात पाºयाने चाळीशी गाठली.ठाणे जिल्ह्यातील उन्हाचा कडाका सकाळी ११ नंतरच जाणवू लागला. दुपारी चारपर्यंत हे तापमान कायम होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा रोड, भार्इंदर, मुरबाड या परिसरात दुपारी पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला. शहापूर तालुक्याने मात्र ही जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानवाढीची नोंद केली. तेथील पाºयाने उन्हाळ््याची चाहूल लागताक्षणीच चाळीशी गाठल्याने यंदाचा उन्हाळा किती तीव्र असेल याची चुणूक पाहायला मिळाली. गेल्यावर्षीही उन्हाळ््यात शहापूर, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांनी सर्वाधिक तापमानाची नोंद केली होती. काही दिवस तेथील पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान पोहोचला होता.गेल्या आठवड्यात वातावरणात झपाट्याने झालेल्या या बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, उष्णतेच्या विकारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी भरपूर पाणी प्या. खूप थकवा जाणवला, तर लिंबू सरबत, कोकम किंवा आवळा सरबत, शहाळ््याचे पाणी प्या. कोल्ंिड्रकपेक्षा नैसर्गिक फळांपासून बनवलेली सरबते प्या असे सल्ले दिले.