शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात सेना, राष्ट्रवादीचे जोरदार शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:12 IST

चित्र स्पष्ट : राजन विचारे, आनंद परांजपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

ठाणे : शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले. या मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दोन्ही उमेदवारांच्या मिरवणुकींचे मार्ग वेगवेगळे ठरवून देण्यात आले होते. दोन्ही उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले; परंतु उन्हामुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

सोमवारी सकाळी राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढली. यावेळी त्यांच्यासमवेत आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यानिमित्ताने राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नियोजन सकाळी १० वाजताचे असले, तरी प्रत्यक्षात सकाळी ११.३० च्या सुमारास राष्टÑवादीच्या कार्यालयापासून रॅली पुढे निघाली. अल्मेडा चौकातून गजानन महाराज मठ, नौपाडा, तलावपाळी, शिवाजी महाराजांचा पुतळा, चिंतामणी चौकातून सरळ सिव्हील रुग्णालयमार्गे रॅली शासकीय विश्रामगृहाजवळ पोहोचली.

दुसरीकडे, शिवसेनेची रॅलीही न्यू इंग्लिश शाळेजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून सकाळी १० वाजता काढण्याचे ठरले होते; परंतु तिचाही मुहूर्त हुकला. ही रॅली राममारुती रोड, गोखले रोड, गावदेवीमार्गे अशोक टॉकीज, प्रभात सिनेमा, तहसीलदार कार्यालय, कौपिनेश्वर मंदिर, जांभळीनाक्यावरून पुढे कोर्टनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी युतीमधील प्रमुख नेत्यांसह महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी १.३० च्या सुमारास उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

१२.२० चा मुहूर्तसकाळी १० वाजता मिरवणूक निघेल, अशी आशा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना होती. परंतु, रॅली निघण्यास उशीर झाला. त्यामुळे परांजपे यांनी गणेश नाईक यांच्यासमवेत चालत जाऊन निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा १२.२० चा मुहूर्त अखेर साधलाच.

जयंत पाटील यांना उशीर : दोन दिवस निवडणूक कार्यालय बंद असल्याने राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नव्हती. सोमवारी सकाळी ११.२० च्या सुमारास ही परवानगी मिळाली. त्यानंतर, १२.४० च्या सुमारास जयंत पाटील ठाण्यात दाखल झाले. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाला होता. 

शिक्षणाच्या मुद्यावर जो प्रचार विरोधकांकडून सुरू आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी ३५ वर्षांपासून जनतेची सेवा करत आहे. जनता माझ्यावर पुन्हा विश्वास टाकेल, यात दुमत नाही.- राजन विचारे, शिवसेनाविद्यमान खासदारांंनी पाच वर्षांत काय केले, हे सर्वांनाच माहीत आहे. मोदींविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.- आनंद परांजपे, राष्टÑवादी

टॅग्स :thane-pcठाणे