शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

ठाण्यात सेना, राष्ट्रवादीचे जोरदार शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:12 IST

चित्र स्पष्ट : राजन विचारे, आनंद परांजपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

ठाणे : शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले. या मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दोन्ही उमेदवारांच्या मिरवणुकींचे मार्ग वेगवेगळे ठरवून देण्यात आले होते. दोन्ही उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले; परंतु उन्हामुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

सोमवारी सकाळी राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढली. यावेळी त्यांच्यासमवेत आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यानिमित्ताने राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नियोजन सकाळी १० वाजताचे असले, तरी प्रत्यक्षात सकाळी ११.३० च्या सुमारास राष्टÑवादीच्या कार्यालयापासून रॅली पुढे निघाली. अल्मेडा चौकातून गजानन महाराज मठ, नौपाडा, तलावपाळी, शिवाजी महाराजांचा पुतळा, चिंतामणी चौकातून सरळ सिव्हील रुग्णालयमार्गे रॅली शासकीय विश्रामगृहाजवळ पोहोचली.

दुसरीकडे, शिवसेनेची रॅलीही न्यू इंग्लिश शाळेजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून सकाळी १० वाजता काढण्याचे ठरले होते; परंतु तिचाही मुहूर्त हुकला. ही रॅली राममारुती रोड, गोखले रोड, गावदेवीमार्गे अशोक टॉकीज, प्रभात सिनेमा, तहसीलदार कार्यालय, कौपिनेश्वर मंदिर, जांभळीनाक्यावरून पुढे कोर्टनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी युतीमधील प्रमुख नेत्यांसह महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी १.३० च्या सुमारास उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

१२.२० चा मुहूर्तसकाळी १० वाजता मिरवणूक निघेल, अशी आशा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना होती. परंतु, रॅली निघण्यास उशीर झाला. त्यामुळे परांजपे यांनी गणेश नाईक यांच्यासमवेत चालत जाऊन निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा १२.२० चा मुहूर्त अखेर साधलाच.

जयंत पाटील यांना उशीर : दोन दिवस निवडणूक कार्यालय बंद असल्याने राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नव्हती. सोमवारी सकाळी ११.२० च्या सुमारास ही परवानगी मिळाली. त्यानंतर, १२.४० च्या सुमारास जयंत पाटील ठाण्यात दाखल झाले. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाला होता. 

शिक्षणाच्या मुद्यावर जो प्रचार विरोधकांकडून सुरू आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी ३५ वर्षांपासून जनतेची सेवा करत आहे. जनता माझ्यावर पुन्हा विश्वास टाकेल, यात दुमत नाही.- राजन विचारे, शिवसेनाविद्यमान खासदारांंनी पाच वर्षांत काय केले, हे सर्वांनाच माहीत आहे. मोदींविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.- आनंद परांजपे, राष्टÑवादी

टॅग्स :thane-pcठाणे