शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाची २८ तासात डबल सेन्चुरी; मंगळवारी दुपार पर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:44 IST

ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी देखील पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यानंतर शहरात मागील २८ तासात विक्रमी २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अजित मांडके (ठाणे)

ठाणे : रविवारी पासून जोर धरलेल्या पावसाने मागील २८ तासात शहरात २८५ मीमी पावसाची नोंद केली आहे. सोमवारी दमदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पावसाने आपले रौद्र रुप ठाणेकरांना दाखविले. दुपार पर्यंत शहरात ७५.४२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. घोडबंदर भागातील मानपाडा, पातलीपाडा, गायमुख, काजुपाडा येथे रस्त्यावरच पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. शहरातील इतर सखल भागातही पाणी साचले होते. संरक्षक भिंत पडणे, वृक्ष पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे अशा घटना घडल्याचे दिसून आले. तर दरड कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. तर दुपार नंतर रेल्वे सेवेवरही काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी देखील पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यानंतर शहरात मागील २८ तासात विक्रमी २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, दुपारी २.३० वाजेपर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. गोकुळनगर, श्रीनगर सोसायटी, आझाद नगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच, रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे श्रीरंग विद्यालयाची सुमारे २०० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसासोबत सोसाट्याचा वारा असल्याने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा भाग पडला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर, घोडबंदर भागातील मानपाडा, पातीलपाडा, काजुपाडा, गायमुख या भागात रस्त्यांनाच नदीचे स्वरुप आल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीला मोठा ब्रेक लागला होता. वाहतुक धिम्या गतीने सुरु होती, येथील वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुक पोलीस तारेवरची कसरत करतांना दिसून आले. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, दातिवली, गणेशपाडा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. कोपरी येथील रामभाऊ मार्ग, येऊर येथील कोपरकर बंगल्याजवळील परिसर, येऊर गाव, माजिवाडा येथील साईनाथ नगर, कोर्टनाका येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, शीळफाटा रोड, खर्डी दिवा रोड, ठाण्यातील श्रीरंग विद्यालय आणि सोसायटी परिसर, घोडबंदर चेना पुल, वृंदावन परिसर, ठाण्यातील आंबेडकरनगर येथील नाला परिसर, कासारवडवली येथील टायटन रु्गणालयाच्या मागील परिसर, मुंब्रा देवी कॉलनी परिसर याठिकाणी पाणी साचले होते. कोपरी आनंदनगर बुद्ध विहार परिसर, येऊर गावातील रस्त्यावर, भाईंदरपाडा भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

दुसरीकडे कळवा वखार चाळ येथे वृक्ष पडल्याची घटना घडली. तसेच दिवा फडकेपाडा, नाखवा हायस्कुल समोर, जिजामाता सोसायटी शिवाई नगर, पºयाचे मैदान विटावा, दिवा कल्याण रोड आदी भागातही वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या.

हिरानंदानी इस्टेट जवळील श्री मॉ शाळेची संरक्षक भिंत कोसळली, घोडबंदर येथील पानखंडा गावात एका घराची भिंती कोसळली. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कळवा येथील पारसिकनगर भागातील ओझोन व्हॅली सोसायटीजवळील नाल्याची भिंत कोसळली. मुंब्रा येथील संजयनगरमधील नाशिक वॉर्ड चाळीतील घराची भिंत पडली. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही. लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथील संतोष पाटील नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घरावर दरड कोसळली. यात जय मातेरे यांच्या घराचे नुकसान झाले असून यात अमरनाथ शर्मा (७०) हे जखमी झाल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील चार खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून येथील नागरिक नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.