शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By मुरलीधर भवार | Updated: June 22, 2023 15:35 IST

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

- मुरलीधर भवार

कल्याण - ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ््यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.एकात्मिक परिवहन व्यवस्थेची भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांनी यापूर्वीच घेतली होती. कल्याण डोंबिवलीच्या पहिवहन समितीचे माजी सभापती राजेश कदम यांनी देखील हीच भूमिका ते सभापती असताना घेतली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम हा आर्थिक तोट्यात आहे. उल्हासनगरला परिवहन सेवा नाही. भिवंडी महापालिकेकडेही परिवहन सेवा उपक्रम नाही. अंबरनाथ आणि बदलापूर पालिका हा उपक्रम चालवू शकत नाही. केवळ ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांचे परिवहन उपक्रम सक्षम रित्या सुरु आहेत.

एकच परिवहन सेवा केल्यास जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगररपालिका हद्दीतील नागरीकांना सार्वजनिक वाहतूकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. महानगर निगम प्राधिकरण स्थापन झाल्यास त्यातून बस सेवेचे रस्त्यावरील संचलन वाढीस लागून खाजगी वाहतूकीसाठी आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रदूषण आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सूटका होण्यास मदत होऊ शकते. सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी एकात्मिक परिवहन सेवेत सहभागी होण्याचे ठराव करुन सरकार दरबारी पाठविले आहेत. या ठरावाची अंमलबजावणी सरकारकडून केली जावे याकडे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात लवकर सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे असे सांगितले.

पाण्याचा कोटा वाढवून मिळण्याची मागणी२७ गावातील नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ज्या प्रमाणे गावातील नागरीकांना पाणी कमी दाबाने मिळते. ती स्थिती बड्या गृहसंकुलाची आहे. गोळवली, दावडी, नांदिवली या पट्ट्यात पाणी कमी येते. ही समस्या लक्षात घेता खासदार शिंदे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ््यांसाेबत बैठक झाली. या बैठकीस राजेश कदम, प्रफुल्ल देशमुख, बंडू पाटील उपस्थित होते. लांबलेला पावसाळा पाहता पाण्याचे नियोजन करुन एमआयडीसीने पाण्याचे वितरण सम प्रमाणात करावे. पाण्याचा दाब वाढवावा. त्याचबरोबर पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी खासदार शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे