शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अवघ्या चार तासांमध्येच ठाणे पोलिसांनी घेतला सहा वर्षीय मुलीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:33 IST

ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरातून रविवारी अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा नौपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्येच छडा लावला. आपली नात सुखरुप मिळाल्यामुळे आजोबांनी पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांमुळे घडली आजोबा नातीची पुनर्भेटखेळता खेळता रस्ता विसरल्याने झाली चुकामूकआजोबांनी मानले पोलिसांचे आभार

ठाणे: मासुंदा तलाव परिसरातून रविवारी अचानक बेपत्ता झालेल्या गौरी शेख या सहा वर्षीय मुलीचा नौपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्येच शोध घेतला. ती जांभळी नाका परिसरात मिळाल्यानंतर तिला सुखरुपपणे उस्मान मकबूल शेख (६९) या आजोबांच्या सोमवारी स्वाधीन करण्यात आले.मासुंदा तलाव येथील भावना हॉटेलसमोरील पदपथावर असलेल्या एका चहाच्या टपरीवर शेख (मुळ रा. मानखेड, जि. लातूर) हे मजूरीचे काम करतात. त्यांची मुलगी क्षयग्रस्त असल्याने तिच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळेच गौरी या नातीसह ते मासुंदा तलाव भागात राहतात. ३० जून २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वा. च्या सुमारास गौरी अचानक बेपत्ता झाली. त्यांनी सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही. अखेर १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शेख यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात नात हरविल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी तात्काळ शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाची या मुलीच्या शोधासाठी निर्मिती केली. मुलीच्या फोटोसह तिच्या आजोबांसमवेत रामचंद्रनगर, लोकमान्यनगर, चरई, खोपट एसटी बस स्थानक तसेच मासुंदा तलाव परिसरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तिचा शोध घेतला. तसेच या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. अखेर जांभळी नाका भाजी मार्केट मध्ये गौरी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. अवघ्या चार तासांमध्येच उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार सुनिल अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, पोलीस नाईक सुनिल राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड यांनी तिचा शोध घेऊन तिच्यावर प्राथमिक उपचार केले. खेळता खेळता रस्ता विसरल्याने या मार्केटमध्ये झोपून राहिल्याचे तिने महिला पोलिसांना आणि तिच्या आजोबांना सांगितले. आपली नात सुखरुप मिळाल्यामुळे शेख यांनी धुमाळ यांच्या पथकाचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी