शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मालेगाववरून कल्याण स्टेशनवर आलेल्या मुलास ठाणे पोलिसांनी सुखरूप सोडले घरी

By अजित मांडके | Updated: October 1, 2022 15:24 IST

Thane News: ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली.

- अजित मांडके ठाणे :  ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली. रेल्वे पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले होते. मात्र त्याच्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यास त्यांच्या स्वाधीन करण्यात चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.

मालेगाव, नवापुरा वार्ड परिसरात राहणारा रिहान उर्फ रेहान अब्दुल करीम शेख हा १० वर्षीय मुलगा मालेगाव येथून हरवला होता. तो थेट कल्याण येथे पोहचला होता. कल्याण रेल्वे स्थानकावर हा मुलगा रेल्वे पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले. त्याच दरम्यान ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकास या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी संस्थेत जाऊन या मुलाची भेट घेऊन त्याच्या पालकांबाबत माहिती विचारली असता तो मालेगाव येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये संपर्क साधून हा मुलगा मिसिंग असल्याची तक्र ार दाखल आहे का याची पडताळणी केली. मात्र कुठेही मिसिंगची तक्रार नसल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसात मिसिंग तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाणो चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मिसिंग मुलांच्या माहितीसाठी चालवण्यात येणा:या व्हाट्सएप ग्रुपवर या मुलाची माहिती प्रसारित केली. एका ग्रुप मध्ये हा मुलगा मालेगाव येथून हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क केला. मुलाच्या पालकांनी ठाण्यात येऊन या मुलाची नुकतीच भेट घेतली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणthaneठाणे