शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:38 IST

यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

ठाणे : यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकºयांनी या कर्जाचा लाभ मोठ्याप्रमाणात घ्यावा, यासाठी सुमारे नऊ दिवस दोन्ही जिल्ह्यात शेतकºयांचे मेळावे आयोजित करून जनजागृती केली जात आहे. यानुसार शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे गुरूवारी पहिला मेळावा घेतल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीककर्ज वाटप शेतकºयांना होणार आहे. यापैकी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४३ कोटी २२ लाखांच्या पीककर्जाचा लाभ सुमारे १६ हजार ४६ शेतकºयांना मिळाला आहे. सुमारे ४८ टक्के कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांमध्ये नियमित कर्ज भरणाºया नऊ हजार ३३२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना १२ कोटी ८९ लाखांचे कर्ज मिळाले आहे. तर कर्जमाफी मिळालेल्या सहा हजार ७१४ शेतकºयांना ३० कोटी ३३ लाखांच्या कर्जाचा लाभ झाला आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात तीन हजार ४४५ कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना २० कोटी ६८ लाखांचे पीक कर्ज मिळाले आहे. तर नियमित कर्ज भरणाºया चार हजार ८७२ शेतकºयांना आठ कोटी ८८ लाखांचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगीरथ भोईर यांनी केला आहे.२९ जूनला वसईच्या शिरसाडफाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात शेतकरी मेळावा आयोजिला आहे. तर ३० जूनला विक्रमगडचे श्री औसरकर सभागृह व डहाणू तालुक्यातील कासा येथील बँकेच्या सभागृहात मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग सभागृह, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात व ६ ला कल्याणच्या नालिंदीगांव भिसोळे येथे मेळावा आहे. याशिवाय ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रा.पं.मध्ये, ९ जुलैला अंबरनाथच्या बेलवली बँक शाखेत व ठाणेच्या कल्याण शीळफाटा दत्त मंदिर सभागृहात शेतकरी मेळावा आहे.