शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:38 IST

यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

ठाणे : यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकºयांनी या कर्जाचा लाभ मोठ्याप्रमाणात घ्यावा, यासाठी सुमारे नऊ दिवस दोन्ही जिल्ह्यात शेतकºयांचे मेळावे आयोजित करून जनजागृती केली जात आहे. यानुसार शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे गुरूवारी पहिला मेळावा घेतल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीककर्ज वाटप शेतकºयांना होणार आहे. यापैकी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४३ कोटी २२ लाखांच्या पीककर्जाचा लाभ सुमारे १६ हजार ४६ शेतकºयांना मिळाला आहे. सुमारे ४८ टक्के कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांमध्ये नियमित कर्ज भरणाºया नऊ हजार ३३२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना १२ कोटी ८९ लाखांचे कर्ज मिळाले आहे. तर कर्जमाफी मिळालेल्या सहा हजार ७१४ शेतकºयांना ३० कोटी ३३ लाखांच्या कर्जाचा लाभ झाला आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात तीन हजार ४४५ कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना २० कोटी ६८ लाखांचे पीक कर्ज मिळाले आहे. तर नियमित कर्ज भरणाºया चार हजार ८७२ शेतकºयांना आठ कोटी ८८ लाखांचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगीरथ भोईर यांनी केला आहे.२९ जूनला वसईच्या शिरसाडफाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात शेतकरी मेळावा आयोजिला आहे. तर ३० जूनला विक्रमगडचे श्री औसरकर सभागृह व डहाणू तालुक्यातील कासा येथील बँकेच्या सभागृहात मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग सभागृह, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात व ६ ला कल्याणच्या नालिंदीगांव भिसोळे येथे मेळावा आहे. याशिवाय ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रा.पं.मध्ये, ९ जुलैला अंबरनाथच्या बेलवली बँक शाखेत व ठाणेच्या कल्याण शीळफाटा दत्त मंदिर सभागृहात शेतकरी मेळावा आहे.