शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आणि नितीन कंपनी येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले असून कोरम मॉलजवळील नाल्यात बुडालेल्या एका तीन वर्षीय मुलीसह तिघांचा शोध सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पालघर जिल्ह्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी ठाणे शहरात दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाल्यांना आलेल्या पुरात कळव्यातील शांतीनगर, वागळे इस्टेटच्या रामनगर आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील नाल्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह गेल्या २४ तासांमध्ये मिळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना शेख (३२) ही महिला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना तिचा मृतदेह मिळाला. तर येऊरच्या मामा भाचे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद शेख (२८, रा. रामनगर) हा डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे पडला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलोमीटर लांब वाहून गेला. अग्निशमन दलाला रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत. तर आपल्या वडिलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेल्या तीन वर्षीय गौरी या मुलीचा शोध वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वागळे इस्टेटमध्ये रास्ता रोकोमुसळधार पावसामध्ये अडकलेल्या कुटुंबाला वाचविण्याच्या प्रयत्नात नाल्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात यंत्रणा कुचराई करीत असल्याचा आरोप करून वाल्मिकी समाज आणि भारिप-बहुजन महासंघाने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. वागळे इस्टेटमधील रामनगरात मुसळधार पावसामध्ये एक महिला आणि मुलगी घरात अडकून पडले होते.मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांना वाचविण्यासाठी नाला ओलांडून जात असताना अजय आठवाल (वय २७) वाहून गेला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून युवकाचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.या भागातील युवक मंगळवारपासून बेपत्ता युवकाचा नाल्यामध्ये उतरून शोध घेत आहेत. आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी मात्र थातूरमातून पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वागळे इस्टेटमधील १६ नंबर सर्कलजवळ वाल्मिकी समाज आणि भारिप बहुजन महासंघाने रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आपात्कालीन यंत्रणेच्या अधिकाºयांनी बेपत्ता युवकाचा कसून शोध घेण्याचे आश्वासन दिले.ज्ञानसाधना नाल्याजवळ राहणारे गंगाराम बालगुडे (५०) यांनी नाल्यात पडलेला ड्रम घेण्यासाठी उडी घेतली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात आला. याच नाल्यात आणखी एक जण बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.कोरम मॉल येथे कामाला असलेली दीपाली बनसोडे (२७) ही महिला पतीसमवेतच मॉलच्या बाहेर उभी होती. या दोघांमध्ये अवघ्या दहा फुटांचे अंतर होते. तिच्या कंबरेपेक्षा जास्त पाणी आल्यानंतर तिला पाण्याचा काहीच अंदाज न आल्यामुळे ती जवळच्याच नाल्यात पडली. यात ती वाहून गेली असून तिचाही शोध अद्याप सुरू आहे.पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला ४० ते ५० वर्षीय अनोळखी मृतदेह जिल्हा मध्यवर्ती कारागृह पाण्याच्या टाकीजवळील नाल्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिळाला.ठाणे शहरातील मनोरमानगर, कोरम मॉल झोपडपट्टी, जिल्हा रुग्णालय परिसर, वागळे इस्टेट, मुंब्रा अशा वेगवेगळ्या भागांत पाण्यात आणि घरांमध्ये अडकलेल्या १०३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.मानपाडा येथे प्रेस्टीज कंपनीची भिंत कोसळून ११ घरांचे नुकसान झाले. रेणू आणि कांचन यादव या महिला यात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पालघरमध्ये पाच बळीपालघर : डहाणू तालुक्यातील आंबेसरी पारसपाडा येथे नयना जाना गहला (५०) ही वृद्ध महिला शेतावरून घरी परतत असताना नाल्यामध्ये वाहून गली. जव्हार तालुक्यातील कोगदा येथील विनोद गणपत दळवी (२२) या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.पालघरमध्ये मुसळधार पावसादरम्यान वाघोबा खिंडीत रात्रीच्या सुमारास धबधब्याकडील वळणावर असलेल्या डोंगराची दरड रस्त्यावर कोसळली.यावेळी प्रवास करणाºया कुटुंबातील एका लहान मुलगी दरडीत सापडून मरण पावल्याची घटना घडली. तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तनिष्का राम बालशी (५) रा. वेवूर-पालघर, राजेश नायर, जेनिस कंपनी बोईसर यांचे मृतदेह सापडले आहेत.