शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आणि नितीन कंपनी येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले असून कोरम मॉलजवळील नाल्यात बुडालेल्या एका तीन वर्षीय मुलीसह तिघांचा शोध सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पालघर जिल्ह्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी ठाणे शहरात दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाल्यांना आलेल्या पुरात कळव्यातील शांतीनगर, वागळे इस्टेटच्या रामनगर आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील नाल्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह गेल्या २४ तासांमध्ये मिळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना शेख (३२) ही महिला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना तिचा मृतदेह मिळाला. तर येऊरच्या मामा भाचे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद शेख (२८, रा. रामनगर) हा डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे पडला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलोमीटर लांब वाहून गेला. अग्निशमन दलाला रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत. तर आपल्या वडिलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेल्या तीन वर्षीय गौरी या मुलीचा शोध वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वागळे इस्टेटमध्ये रास्ता रोकोमुसळधार पावसामध्ये अडकलेल्या कुटुंबाला वाचविण्याच्या प्रयत्नात नाल्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात यंत्रणा कुचराई करीत असल्याचा आरोप करून वाल्मिकी समाज आणि भारिप-बहुजन महासंघाने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. वागळे इस्टेटमधील रामनगरात मुसळधार पावसामध्ये एक महिला आणि मुलगी घरात अडकून पडले होते.मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांना वाचविण्यासाठी नाला ओलांडून जात असताना अजय आठवाल (वय २७) वाहून गेला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून युवकाचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.या भागातील युवक मंगळवारपासून बेपत्ता युवकाचा नाल्यामध्ये उतरून शोध घेत आहेत. आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी मात्र थातूरमातून पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वागळे इस्टेटमधील १६ नंबर सर्कलजवळ वाल्मिकी समाज आणि भारिप बहुजन महासंघाने रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आपात्कालीन यंत्रणेच्या अधिकाºयांनी बेपत्ता युवकाचा कसून शोध घेण्याचे आश्वासन दिले.ज्ञानसाधना नाल्याजवळ राहणारे गंगाराम बालगुडे (५०) यांनी नाल्यात पडलेला ड्रम घेण्यासाठी उडी घेतली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात आला. याच नाल्यात आणखी एक जण बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.कोरम मॉल येथे कामाला असलेली दीपाली बनसोडे (२७) ही महिला पतीसमवेतच मॉलच्या बाहेर उभी होती. या दोघांमध्ये अवघ्या दहा फुटांचे अंतर होते. तिच्या कंबरेपेक्षा जास्त पाणी आल्यानंतर तिला पाण्याचा काहीच अंदाज न आल्यामुळे ती जवळच्याच नाल्यात पडली. यात ती वाहून गेली असून तिचाही शोध अद्याप सुरू आहे.पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला ४० ते ५० वर्षीय अनोळखी मृतदेह जिल्हा मध्यवर्ती कारागृह पाण्याच्या टाकीजवळील नाल्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिळाला.ठाणे शहरातील मनोरमानगर, कोरम मॉल झोपडपट्टी, जिल्हा रुग्णालय परिसर, वागळे इस्टेट, मुंब्रा अशा वेगवेगळ्या भागांत पाण्यात आणि घरांमध्ये अडकलेल्या १०३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.मानपाडा येथे प्रेस्टीज कंपनीची भिंत कोसळून ११ घरांचे नुकसान झाले. रेणू आणि कांचन यादव या महिला यात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पालघरमध्ये पाच बळीपालघर : डहाणू तालुक्यातील आंबेसरी पारसपाडा येथे नयना जाना गहला (५०) ही वृद्ध महिला शेतावरून घरी परतत असताना नाल्यामध्ये वाहून गली. जव्हार तालुक्यातील कोगदा येथील विनोद गणपत दळवी (२२) या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.पालघरमध्ये मुसळधार पावसादरम्यान वाघोबा खिंडीत रात्रीच्या सुमारास धबधब्याकडील वळणावर असलेल्या डोंगराची दरड रस्त्यावर कोसळली.यावेळी प्रवास करणाºया कुटुंबातील एका लहान मुलगी दरडीत सापडून मरण पावल्याची घटना घडली. तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तनिष्का राम बालशी (५) रा. वेवूर-पालघर, राजेश नायर, जेनिस कंपनी बोईसर यांचे मृतदेह सापडले आहेत.