शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:29 IST

ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली.

- पंकज रोडेकरठाणे : ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली. यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ९२० टार्गेट दिले असून त्यापैकी ६३५ जणांनी नेत्रदान केल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.दरवर्षी शासनाकडून नेत्रदानाबाबत प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले जाते. त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत प्रत्येकी चारशेचे टार्गेट दिले होते. त्या टार्गेटपेक्षा ते अधिक पूर्ण केल्यानंतर २०१८-१९ या वर्षाकरिता ठाणे-पालघरला ९२० चे टार्गेट दिले गेले. त्यानुसार, एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यान या दोन्ही जिल्ह्यांतून एकूण ६३५ जणांनी नेत्रदान केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होत असताना त्यातील सर्व नेत्र उपयुक्त ठरतील, असे नाही. त्यातील उपयुक्त असलेले नेत्र हे प्रतीक्षायादीतील एक हजार ३६९ व्यक्तींना लाभल्याने त्यांना दृष्टी मिळत आहे. अशा प्रकारे ठाणे, मुंबईतील लोकांना दृष्टी मिळाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.अडीच वर्षांत दोन हजार ३७३ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे १,३६९ जणांना या वर्षात दृष्टी मिळाली आहे. याबाबत राबवण्यात आलेल्या जनजागृतीचे हे फलित असल्याचे दिसते.- डॉ. पी.के. देशमुख,जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणे