शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 23:37 IST

बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.

- नारायण जाधवठाणे : मुंबईच्या कुशीत असलेली आणि राजधानीची तहान भागवणारी १० धरणे असलेल्या ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षांत पोषण आहारावर दीडशे कोटींचा निधी खर्च होऊन तब्बल ४०९३ बालमृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १५०६ बालमृत्यू झाल्याची नोंद जि.प.च्या महिला व बालविकास विभागाच्या दप्तरी आहे. शिवाय, सध्या सॅमची ६८ तर मॅमची ८८२ बालके आढळली आहेत. तर, पालघर जिल्ह्यात पाच वर्षांत २५८७ बालमृत्यू झाले आहेत.बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.यंदाच्या एप्रिल २०१९ मध्ये सॅमच्या १६३ आणि मॅमच्या १७९६ बालकांची नोंद झाली आहे. मात्र, शासनदरबारी बालमृत्यूंची नोंद ही कुपोषणाने नव्हे, तर न्यूमोनिया, डायरिया व तत्सम आजाराने झाल्याचे भासवले जात असल्याने कोवळी पानगळ दरवर्षी या निष्ठूरतेमुळे झडतच आहे.

पोषण आहारावर पाच वर्षांत दीडशे कोटीठाणे जिल्ह्यात बालकांच्या नियमित आहारावर गेल्या पाच वर्षांत ७९ कोटी ७९ लाख सहा हजार रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे २०१४-१५ मध्ये ३४ कोटी ८२ लाख ८६ हजार असलेला निधी २०१८-१९ मध्ये नऊ कोटी १८ लाख ४६ हजारांवर आला आहे.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७० कोटी ३२ लाख ९९ हजार खर्च झाले आहेत. यात २०१५-१६ मध्ये एक कोटी १२ लाख ९१ हजार, तर २०१८-१९ मध्ये २० कोटी ८६ लाख ४१ हजार, तर २०१९-२० मध्ये एप्रिल अखेरपर्यंत सहा कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये खर्च झालेले आहेत.६९३ अंगणवाड्यांत शौचालयच नाहीपालघर जिल्ह्यातील ३१८३ अंगणवाड्यांपैकी २००५ अंगणवाड्यांची स्वत:ची वास्तू असून ५८४ अंगणवाड्या भाड्याच्या घरांत भरत आहेत. त्यातील ५७६ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालविकास विभागाची आकडेवारीच सांगते. शिवाय, ६९३ अंगणवाड्यांत शौचालय नसल्याने तेथील बालकांना उघड्यावरच आपला नैसर्गिक विधी उरकावा लागत आहे. त्यामुळे दुर्गमपाड्यांतील अंगणवाडीसेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.

टॅग्स :thaneठाणे