- नारायण जाधवठाणे : मुंबईच्या कुशीत असलेली आणि राजधानीची तहान भागवणारी १० धरणे असलेल्या ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षांत पोषण आहारावर दीडशे कोटींचा निधी खर्च होऊन तब्बल ४०९३ बालमृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १५०६ बालमृत्यू झाल्याची नोंद जि.प.च्या महिला व बालविकास विभागाच्या दप्तरी आहे. शिवाय, सध्या सॅमची ६८ तर मॅमची ८८२ बालके आढळली आहेत. तर, पालघर जिल्ह्यात पाच वर्षांत २५८७ बालमृत्यू झाले आहेत.बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.यंदाच्या एप्रिल २०१९ मध्ये सॅमच्या १६३ आणि मॅमच्या १७९६ बालकांची नोंद झाली आहे. मात्र, शासनदरबारी बालमृत्यूंची नोंद ही कुपोषणाने नव्हे, तर न्यूमोनिया, डायरिया व तत्सम आजाराने झाल्याचे भासवले जात असल्याने कोवळी पानगळ दरवर्षी या निष्ठूरतेमुळे झडतच आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 23:37 IST