शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ठाणे, नवी मुंबईमध्ये दिवाळीनंतर रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:11 IST

लढा कोरोनाशी : आठवड्यात चार हजार ४१२ रुग्णांची भर

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात दिवाळी आधी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता वाढत आहे. दिवाळीनंतरच्या आठ दिवसांत चार हजार ४१२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक ठाणे शहरात एक हजार १५२ तर नवी मुंबईत एक हजार २७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात दिवाळीच्या काही दिवस आधी ३०० ते ३५० रुग्ण दिवसभरात सापडत होते. मात्र, भाऊबीजेनंतर त्यात दररोज १०० रुग्णांची भर पडत आहे.

आठवड्यात चार हजार ४१२ रुग्णांची भर झाल्यामुळे जिल्ह्यात दोन लाख २४ हजार १६१ रुग्ण झाले आहेत. यात ठाणे व नवी मुंबईत या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मात्र या शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही उत्तम आहे. ठाणे शहरात आठवड्यात एक हजार ७५ रुग्ण बरे झाले आहेत. या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईत ८१७ रुग्ण बरे झाले असून १९ रुग्णं दगावले आहेत. एका आठवड्यात केडीएमसी हद्दीत ९५१ रुग्ण वाढले असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३९९ रुग्ण वाढले, तर आठ रुग्ण दगावले. ग्रामीण भागात ३५५ रुग्णे आठवड्यात वाढले असून १० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात १६० रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर ८५ मृत्यू जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या आठवड्यात ८५ मृत्यू झाले आहेत. यात ठाणे शहरात सर्वाधिक २५ रुग्ण, नवी मुंबईत १९, कल्याण-डोंबिवली परिसरात १५ रुग्ण दगावले आहेत. यापेक्षा कमी म्हणजे दहा रुग्ण ग्रामीण भागात आणि मीरा-भाईंदर परिसरात आठ मृत्यू झाले आहेत.

ठाण्यात दिवाळीनंतर रुग्ण वाढत आहेत. याआधी शहरात रुग्ण तपासणीचे प्रमाण दिवसाला दोन हजारांपर्यंत होते. आता ते सहा हजारांपर्यंत असल्यामुळे रुग्ण निश्चित करणे शक्य झाले आहे. दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता नाही.-डाॅ. विपिन शर्मा, आयुक्त, ठामपा

त्याच भागात रुग्ण वाढण्याचे कारणठाणे शहरात दिवाळीआधी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी सारखी वर्दळ होती. या गर्दीच्या कालावधीत मास्क लावणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. याशिवाय सामाजिक अंतर पाळण्याचा अभाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची वाढ दिसून येत आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या