शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

ठाणे, नवी मुंबईमध्ये दिवाळीनंतर रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:11 IST

लढा कोरोनाशी : आठवड्यात चार हजार ४१२ रुग्णांची भर

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात दिवाळी आधी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता वाढत आहे. दिवाळीनंतरच्या आठ दिवसांत चार हजार ४१२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक ठाणे शहरात एक हजार १५२ तर नवी मुंबईत एक हजार २७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात दिवाळीच्या काही दिवस आधी ३०० ते ३५० रुग्ण दिवसभरात सापडत होते. मात्र, भाऊबीजेनंतर त्यात दररोज १०० रुग्णांची भर पडत आहे.

आठवड्यात चार हजार ४१२ रुग्णांची भर झाल्यामुळे जिल्ह्यात दोन लाख २४ हजार १६१ रुग्ण झाले आहेत. यात ठाणे व नवी मुंबईत या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मात्र या शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही उत्तम आहे. ठाणे शहरात आठवड्यात एक हजार ७५ रुग्ण बरे झाले आहेत. या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईत ८१७ रुग्ण बरे झाले असून १९ रुग्णं दगावले आहेत. एका आठवड्यात केडीएमसी हद्दीत ९५१ रुग्ण वाढले असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३९९ रुग्ण वाढले, तर आठ रुग्ण दगावले. ग्रामीण भागात ३५५ रुग्णे आठवड्यात वाढले असून १० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात १६० रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर ८५ मृत्यू जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या आठवड्यात ८५ मृत्यू झाले आहेत. यात ठाणे शहरात सर्वाधिक २५ रुग्ण, नवी मुंबईत १९, कल्याण-डोंबिवली परिसरात १५ रुग्ण दगावले आहेत. यापेक्षा कमी म्हणजे दहा रुग्ण ग्रामीण भागात आणि मीरा-भाईंदर परिसरात आठ मृत्यू झाले आहेत.

ठाण्यात दिवाळीनंतर रुग्ण वाढत आहेत. याआधी शहरात रुग्ण तपासणीचे प्रमाण दिवसाला दोन हजारांपर्यंत होते. आता ते सहा हजारांपर्यंत असल्यामुळे रुग्ण निश्चित करणे शक्य झाले आहे. दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता नाही.-डाॅ. विपिन शर्मा, आयुक्त, ठामपा

त्याच भागात रुग्ण वाढण्याचे कारणठाणे शहरात दिवाळीआधी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी सारखी वर्दळ होती. या गर्दीच्या कालावधीत मास्क लावणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. याशिवाय सामाजिक अंतर पाळण्याचा अभाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची वाढ दिसून येत आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या