शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ठाणे महापालिका हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेची लगबग सुरु, पहिले बक्षीस ५० लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:14 IST

ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक स्वच्छतेसाठी दिले जाणार गुणस्पर्धेचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार

ठाणे - राज्य शासनाने जारी केलेल्या एका आध्यादेशानुसार ठाणे महापालिकेने आता स्वच्छ प्रभाग स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जो प्रभाग या स्पर्धेत बाजी मारेल त्याला ५० लाखांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने एक त्रयस्त समिती नेमली असून या समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना देखील जागरुक केले जाणार आहे.                 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शहरात कचरा लाख मोलाचा या अंतर्गत निर्मितीच्या जागी कचऱ्याचे वर्गीकरण (ओला व सुका) करुन या वर्गीकरणाकृत केलेल्या कचऱ्यावर केंद्रीत अथवा विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्याबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या असून त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांअतर्गत स्पर्धा घेण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार उशिराने का होईना ठाणे महापालिकेने देखील या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा प्रत्येक प्रभागात घेतली जाणार आहे. स्वच्छ प्रभाग ठेवणे, घरोगरी जाऊन कचरा संकलन पध्दत अवलंबिणाऱ्या घरांचे प्रमाण, १०० घरातून संकलनाची टक्केवारी यासाठी १०० गुण, एकूण निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किती टक्के कचऱ्याचे ओला व सुका कचरा या स्वरुपात वर्गीकरण केले जाते यासाठी ४०० गुण, वार्डमध्येच ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया केली जाते, यासाठी १००, वार्डातील नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणांचे सुशोभिकरण यासाठी ५०, वार्डमधील सर्व घरांमध्ये १०० टक्के वैयक्ति शौचालयांचे प्रमाण १००, वैयक्तीक सामुदायिक शौचालयांचे प्रमाण ५० टक्के, नगरसेवकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ विषयी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत यासाठी ४०० गुण, वार्डात १०० टक्के मालमता कर संकलन करण्यात आलेले आहे का? यासाठी ५० गुण, वॉर्डात प्लास्टीक बंद करण्यात आली असून राबविण्यात येत आहे ५० गुण आदींच्या स्वरुपात मार्कस दिले जाणार आहेत.           त्यानुसार आता येत्या दोन ते तीन दिवसात ही स्पर्धा त्रयस्त समितीच्या माध्यमातून सुरु होणार आहे. नगरसेवकांना देखील या विषयीची माहिती दिली जाणार आहे. ज्या वॉर्डांना या स्पर्धेत अधिक गुण मिळतील त्यांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. परंतु यातून ज्या प्रभागांचे क्रमांक लागणार आहेत. त्यांचा अहवाल हा शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाकडून पुन्हा याची माहिती घेतली जाणार असून त्यानंतरच निकाल दिला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त