शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Thane: महापालिका आयुक्तांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By अजित मांडके | Updated: May 1, 2023 15:41 IST

Thane: घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.

- अजित मांडकेठाणे : नाले सफाईच्या कामांचे सोशल आॅडीट होणे गरजेचे आहे. नालेसफाई ही झालीच नाही पाहिजे या दृष्टीने काम केले पाहिजे, पाण्याची समस्या आजही शहरात अनेक ठिकाणी भेडसावत आहेत, पाण्याच्या समस्या आॅफीसमध्ये सोडविता येणार नाही. घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.

महाराष्टÑ दिनी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणेकर नागरीकांशी संवाद साधला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाºया ठाणे महापालिकेचा गौरव केला होता. त्याच अनुषंगाने आयुक्तांनी देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभागाचा सत्कार केला. परंतु हा सत्कार करीत असतांना हरळून जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. ठाणेकर नागरीकांसाठी आपण काम केले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. तक्रारींचे प्रमाण हे कमी झाले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मालमत्ता कर विभागाने यंदा ८०० कोटी नाही तर १ हजार कोटींचे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी सुचनाही केली. आपण देत असलेल्या सेवा, सुविधा अशा दिल्या पाहिजे की त्याचा अभिमान हा ठाणेकरांना वाटायला हवा. शहर सौंदर्यीकरणात केवळ रंगरंगोटी महत्वाची नाही तर रस्ते, उद्याने, सेवा रस्ते, फुटपाथ आदींसह इतर गोष्टी देखील त्यात महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विभाग कोणाचा हे न पाहता, ठाणेकरांना चांगल्या सेवा कशा देता येतील हे पाहणे महत्वाचे आहे, महापालिका चुकत असले तर त्यासाठी ठाणेकरांनी देखील त्या चुका दाखविणे गरजेचे आहे. महापालिकेवर २२०० कोटींचे दायीत्व असतांना आजही शहरात कामे सुरु आहेत. परंतु चांगली कामे होणे गरजेचे आहे. शहरात लावण्यात आलेल्या साईन बोर्डवरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील उद्यानांची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज शाळेतील मुलेही रस्त्यावर खड्डे का असा सवाल करीत आहेत. मात्र आपण ठरविले तर शहरातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. तशी मानसिकता असायला हवी तरच कामे चांगली होतील असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत दिलेल्या वेळेतच कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. दूषीत पाणी जातेच कसे असा सवाल उपस्थित करीत केवळ आॅफीसमध्ये बसून पाण्याच्या समस्या सुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाईच्या कामांचे सोशल आॅडीट झाले पाहिजे, कचरा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. रस्ते सफाई देखील समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही पालिकेचा जो सोशल विभाग आहे, तो कामात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोणतीही तक्रार ही १२ तासांच्या आत सोडविली गेली पाहिजे. कर्मचाºयांच्या देखील समस्या आहेत, त्या सोडविल्याच गेल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे