शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

Thane: महापालिका आयुक्तांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By अजित मांडके | Updated: May 1, 2023 15:41 IST

Thane: घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.

- अजित मांडकेठाणे : नाले सफाईच्या कामांचे सोशल आॅडीट होणे गरजेचे आहे. नालेसफाई ही झालीच नाही पाहिजे या दृष्टीने काम केले पाहिजे, पाण्याची समस्या आजही शहरात अनेक ठिकाणी भेडसावत आहेत, पाण्याच्या समस्या आॅफीसमध्ये सोडविता येणार नाही. घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.

महाराष्टÑ दिनी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणेकर नागरीकांशी संवाद साधला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाºया ठाणे महापालिकेचा गौरव केला होता. त्याच अनुषंगाने आयुक्तांनी देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभागाचा सत्कार केला. परंतु हा सत्कार करीत असतांना हरळून जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. ठाणेकर नागरीकांसाठी आपण काम केले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. तक्रारींचे प्रमाण हे कमी झाले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मालमत्ता कर विभागाने यंदा ८०० कोटी नाही तर १ हजार कोटींचे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी सुचनाही केली. आपण देत असलेल्या सेवा, सुविधा अशा दिल्या पाहिजे की त्याचा अभिमान हा ठाणेकरांना वाटायला हवा. शहर सौंदर्यीकरणात केवळ रंगरंगोटी महत्वाची नाही तर रस्ते, उद्याने, सेवा रस्ते, फुटपाथ आदींसह इतर गोष्टी देखील त्यात महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विभाग कोणाचा हे न पाहता, ठाणेकरांना चांगल्या सेवा कशा देता येतील हे पाहणे महत्वाचे आहे, महापालिका चुकत असले तर त्यासाठी ठाणेकरांनी देखील त्या चुका दाखविणे गरजेचे आहे. महापालिकेवर २२०० कोटींचे दायीत्व असतांना आजही शहरात कामे सुरु आहेत. परंतु चांगली कामे होणे गरजेचे आहे. शहरात लावण्यात आलेल्या साईन बोर्डवरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील उद्यानांची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज शाळेतील मुलेही रस्त्यावर खड्डे का असा सवाल करीत आहेत. मात्र आपण ठरविले तर शहरातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. तशी मानसिकता असायला हवी तरच कामे चांगली होतील असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत दिलेल्या वेळेतच कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. दूषीत पाणी जातेच कसे असा सवाल उपस्थित करीत केवळ आॅफीसमध्ये बसून पाण्याच्या समस्या सुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाईच्या कामांचे सोशल आॅडीट झाले पाहिजे, कचरा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. रस्ते सफाई देखील समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही पालिकेचा जो सोशल विभाग आहे, तो कामात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोणतीही तक्रार ही १२ तासांच्या आत सोडविली गेली पाहिजे. कर्मचाºयांच्या देखील समस्या आहेत, त्या सोडविल्याच गेल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे