शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

ठाणे महापालिकेचे आयुक्त अहंकारी - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:23 IST

ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते.

ठळक मुद्देस्थानिक आमदार समस्या सोडविण्यात अपयशीमनसे मारामारी करणारा  पक्ष

ठाणे - एखादा आमदार ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन देतो, त्यावेळेस त्यांनी त्याचा सन्मान करीत उभे राहून ते स्विकारणे अपेक्षित असते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तसे काहीच केले नाही, ते एक अहंकारी आयुक्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला. या प्रकारचा येत्या अधिवेशनात जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.                                मुंब्य्रातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आझमी हे ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी आलेल्या अनुभवानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट आयुक्तांवर निषाना साधला. कोणताही आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्या आमदाराचा सन्मान करणे गरजेचे आहे, आलेल्या आमदाराला दारापर्यंत सोडले पाहिजे, परंतु आयुक्तांनी साधे म्हणने देखील व्यवस्थित ऐकूण घेतले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंब्य्रातील ऊर्द शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसून त्यांना दरवाजे देखील नाही, इमारतींची अवस्था दयनीय आहे. ही माहिती त्यांना दिली असता मी काय करु असे उलट उत्तर आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक आयुक्तांनी या समस्या सोडविणे अपेक्षित असतांना अशा अहंकारी पध्दतीने उत्तरे देणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.                            दुसरीकडे मुंब्य्रातील कब्रस्थानाची जागा प्रशासनाने बदलली आहे. आता जी जागा प्रस्तावित केली आहे, ती जागा येथील रहिवाशांनी खुप लांब पडणार आहे. परंतु आयुक्तांच्या म्हणन्यानुसार आधीची जागा ही सीरआरझेडची असल्यानेच कब्रस्तानची जागा हलविण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विधानात तथ्य वाटत नसल्याने याबाबत माहिती अधिकार टाकला जाणार असून, त्यात माहिती चुकीची आढळल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मुंब्य्रात फेरीवाल्यांची समस्या देखील गंभीर स्वरुप धारण करीत असून फुटपाथवरुन चालणे शक्य होत नाही, त्यामुळे फेरीवाला झोन तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार कमी पडत असल्यानेच आता आम्हाला या समस्या सोडवाव्यात लागत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा नामोउल्लेख टाळत आरोप केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे मल्टीप्लेक्सचा मुद्दा घेऊन ते आता भांडत आहेत. मनसे केवळ गुंडगीरी आणि मारामारी करणारा पक्ष असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शिवसेना आणि भाजपा जरी वेगळ्या विर्दभासाठी आग्रही असली तरी देखील आम्ही त्यांनी साथ देणार नसल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAbu Azmiअबू आझमी