शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

ठाणे महापालिकेचे आयुक्त अहंकारी - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:23 IST

ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते.

ठळक मुद्देस्थानिक आमदार समस्या सोडविण्यात अपयशीमनसे मारामारी करणारा  पक्ष

ठाणे - एखादा आमदार ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन देतो, त्यावेळेस त्यांनी त्याचा सन्मान करीत उभे राहून ते स्विकारणे अपेक्षित असते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तसे काहीच केले नाही, ते एक अहंकारी आयुक्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला. या प्रकारचा येत्या अधिवेशनात जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.                                मुंब्य्रातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आझमी हे ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी आलेल्या अनुभवानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट आयुक्तांवर निषाना साधला. कोणताही आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्या आमदाराचा सन्मान करणे गरजेचे आहे, आलेल्या आमदाराला दारापर्यंत सोडले पाहिजे, परंतु आयुक्तांनी साधे म्हणने देखील व्यवस्थित ऐकूण घेतले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंब्य्रातील ऊर्द शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसून त्यांना दरवाजे देखील नाही, इमारतींची अवस्था दयनीय आहे. ही माहिती त्यांना दिली असता मी काय करु असे उलट उत्तर आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक आयुक्तांनी या समस्या सोडविणे अपेक्षित असतांना अशा अहंकारी पध्दतीने उत्तरे देणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.                            दुसरीकडे मुंब्य्रातील कब्रस्थानाची जागा प्रशासनाने बदलली आहे. आता जी जागा प्रस्तावित केली आहे, ती जागा येथील रहिवाशांनी खुप लांब पडणार आहे. परंतु आयुक्तांच्या म्हणन्यानुसार आधीची जागा ही सीरआरझेडची असल्यानेच कब्रस्तानची जागा हलविण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विधानात तथ्य वाटत नसल्याने याबाबत माहिती अधिकार टाकला जाणार असून, त्यात माहिती चुकीची आढळल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मुंब्य्रात फेरीवाल्यांची समस्या देखील गंभीर स्वरुप धारण करीत असून फुटपाथवरुन चालणे शक्य होत नाही, त्यामुळे फेरीवाला झोन तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार कमी पडत असल्यानेच आता आम्हाला या समस्या सोडवाव्यात लागत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा नामोउल्लेख टाळत आरोप केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे मल्टीप्लेक्सचा मुद्दा घेऊन ते आता भांडत आहेत. मनसे केवळ गुंडगीरी आणि मारामारी करणारा पक्ष असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शिवसेना आणि भाजपा जरी वेगळ्या विर्दभासाठी आग्रही असली तरी देखील आम्ही त्यांनी साथ देणार नसल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAbu Azmiअबू आझमी