शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पुण्यातील संमेलनात ठाणेकर कवींची बाजी

By admin | Updated: June 29, 2017 02:48 IST

एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली. त्यांना कालिदास पुरस्कार देण्यात आला.महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेतर्फेआठव्या वर्धापन दिनानिमित्त कालिदास यांच्या वाङ्मयावर आधारित एकदिवसीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवी आणि लेखकांनी कालिदासांच्या साहित्यावर आधारित निबंधांचे वाचन केले. तसेच निवडक ३५ कवींनी कविता सादर केल्या. यामध्ये ठाण्यातील ४ कवींचा समावेश होता. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ कवी जयंत भावे यांनी आपल्या ‘देव देवळातून बाहेर आला’ या कवितेतून देव दगडात नसतो, तर तो माणसांत असतो आणि माणसांतच राहतो. जातीपाती न मानता अनेक संतांच्या मदतीला देव धावून आला आणि संत म्हणून त्यानेच जनसेवाही केली, असा आशय मांडला. तर, ‘यौवनाच्या पैलतीरावरचा’ या कवितेत कवी रूपेश पवार यांनी पावसाचा आनंद घेणाऱ्या तरु णीला, भरपावसात जाणवणाऱ्या आभासी प्रियकराचे वर्णन केले. कवयित्री रेशमा मेहता यांनी ‘रेशमी धुके’ या कवितेतून सख्याच्या आतुर ओढीतून निर्माण झालेली प्रेमाची उत्कट भावना मांडली तसेच ललित निबंधातून क ालिदासाचे काव्यभाव व्यक्त केले.