शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

By अजित मांडके | Updated: July 5, 2024 16:16 IST

नवे चिन्हही मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता ठाण्यातील अजित पवार गटाने मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघासाठी नजीब मुल्ला यांनी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळे आगामी निवडणुक शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विरुध्द नजीब मुल्ला यांच्यात होणार असल्याचेच चित्र आहे. आव्हाड मागील १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. परंतु आता पक्ष आणि चिन्हही गेल्याने नवीन पक्ष आणि चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच कळवा, मुंब्य्रात सध्या अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु या निवडणुकीत ठाण्यातील आव्हाडांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून मतांची पेरणी सुरु झाली आहे. जेव्हा पासून पक्षाचे दोन तुकडे झाले तेव्हा पासून नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या मतदार संघात तळ ठोकण्यास सुरवात केली आहे. विविध प्रकारचे शिबिर, शासनाच्या योजना, विकास कामे आदींसह आरोप प्रत्यारोप करीत आव्हाडांना शह देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरु आहे. आव्हाडही त्यांना प्रतिउत्तर देत आव्हान पेलत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात शासनाकडून मुल्ला यांनी या मतदार संघासाठी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यातून विकास कामे करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यात मागील १५ वर्षात या मतदार संघात कशी चुकीच्या पध्दतीने कामे झाली, याचा पदार्फाश केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मतदार संघात विकास कामे झालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे मुल्ला हे आमदार नसतांनाही त्यांनी या मतदार संघासाठी निधी आणला आहे. मात्र आव्हाड हे आमदार असतांनाही त्यांना निधी मिळत नसल्याने त्यांनी याविरोधात थेट विधानसभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तसा आव्हाड विरुध्द मुल्ला संर्घष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

परंतु मागील १५ वर्षात आपण काय केले हे जनतेला सांगण्यासाठी सध्या कळवा, मुंब्य्रात विविध आशयाचे फलक झळकू लागले आहेत. त्या फलकांवर १५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची, सफर अभी बाकी है..., १५ वर्षे प्रगतीची, सुख सुविधांची अन, सृजनशीलतेची, १५ वर्षे जिद्दीची, सातत्याची आणि प्रयत्नांची, अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून आपण या कालावधीत काय काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न आव्हाडांकडून सुरु आहे. तसेच बदलला पक्ष आणि त्याचे चिन्ह हे देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे या हेतून तशा आशायचे देखील फलक मुंब्रा, कळवा भागात लावण्यात आले आहेत. आता त्याचा किती परिणाम होणार हे आता येणाºया विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार