शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

By अजित मांडके | Updated: July 5, 2024 16:16 IST

नवे चिन्हही मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता ठाण्यातील अजित पवार गटाने मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघासाठी नजीब मुल्ला यांनी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळे आगामी निवडणुक शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विरुध्द नजीब मुल्ला यांच्यात होणार असल्याचेच चित्र आहे. आव्हाड मागील १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. परंतु आता पक्ष आणि चिन्हही गेल्याने नवीन पक्ष आणि चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच कळवा, मुंब्य्रात सध्या अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु या निवडणुकीत ठाण्यातील आव्हाडांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून मतांची पेरणी सुरु झाली आहे. जेव्हा पासून पक्षाचे दोन तुकडे झाले तेव्हा पासून नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या मतदार संघात तळ ठोकण्यास सुरवात केली आहे. विविध प्रकारचे शिबिर, शासनाच्या योजना, विकास कामे आदींसह आरोप प्रत्यारोप करीत आव्हाडांना शह देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरु आहे. आव्हाडही त्यांना प्रतिउत्तर देत आव्हान पेलत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात शासनाकडून मुल्ला यांनी या मतदार संघासाठी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यातून विकास कामे करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यात मागील १५ वर्षात या मतदार संघात कशी चुकीच्या पध्दतीने कामे झाली, याचा पदार्फाश केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मतदार संघात विकास कामे झालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे मुल्ला हे आमदार नसतांनाही त्यांनी या मतदार संघासाठी निधी आणला आहे. मात्र आव्हाड हे आमदार असतांनाही त्यांना निधी मिळत नसल्याने त्यांनी याविरोधात थेट विधानसभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तसा आव्हाड विरुध्द मुल्ला संर्घष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

परंतु मागील १५ वर्षात आपण काय केले हे जनतेला सांगण्यासाठी सध्या कळवा, मुंब्य्रात विविध आशयाचे फलक झळकू लागले आहेत. त्या फलकांवर १५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची, सफर अभी बाकी है..., १५ वर्षे प्रगतीची, सुख सुविधांची अन, सृजनशीलतेची, १५ वर्षे जिद्दीची, सातत्याची आणि प्रयत्नांची, अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून आपण या कालावधीत काय काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न आव्हाडांकडून सुरु आहे. तसेच बदलला पक्ष आणि त्याचे चिन्ह हे देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे या हेतून तशा आशायचे देखील फलक मुंब्रा, कळवा भागात लावण्यात आले आहेत. आता त्याचा किती परिणाम होणार हे आता येणाºया विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार