शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

By अजित मांडके | Updated: July 5, 2024 16:16 IST

नवे चिन्हही मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता ठाण्यातील अजित पवार गटाने मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघासाठी नजीब मुल्ला यांनी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळे आगामी निवडणुक शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विरुध्द नजीब मुल्ला यांच्यात होणार असल्याचेच चित्र आहे. आव्हाड मागील १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. परंतु आता पक्ष आणि चिन्हही गेल्याने नवीन पक्ष आणि चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच कळवा, मुंब्य्रात सध्या अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु या निवडणुकीत ठाण्यातील आव्हाडांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून मतांची पेरणी सुरु झाली आहे. जेव्हा पासून पक्षाचे दोन तुकडे झाले तेव्हा पासून नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या मतदार संघात तळ ठोकण्यास सुरवात केली आहे. विविध प्रकारचे शिबिर, शासनाच्या योजना, विकास कामे आदींसह आरोप प्रत्यारोप करीत आव्हाडांना शह देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरु आहे. आव्हाडही त्यांना प्रतिउत्तर देत आव्हान पेलत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात शासनाकडून मुल्ला यांनी या मतदार संघासाठी ६० कोटींचा निधी आणला आहे. त्यातून विकास कामे करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यात मागील १५ वर्षात या मतदार संघात कशी चुकीच्या पध्दतीने कामे झाली, याचा पदार्फाश केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मतदार संघात विकास कामे झालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे मुल्ला हे आमदार नसतांनाही त्यांनी या मतदार संघासाठी निधी आणला आहे. मात्र आव्हाड हे आमदार असतांनाही त्यांना निधी मिळत नसल्याने त्यांनी याविरोधात थेट विधानसभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तसा आव्हाड विरुध्द मुल्ला संर्घष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

परंतु मागील १५ वर्षात आपण काय केले हे जनतेला सांगण्यासाठी सध्या कळवा, मुंब्य्रात विविध आशयाचे फलक झळकू लागले आहेत. त्या फलकांवर १५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची, सफर अभी बाकी है..., १५ वर्षे प्रगतीची, सुख सुविधांची अन, सृजनशीलतेची, १५ वर्षे जिद्दीची, सातत्याची आणि प्रयत्नांची, अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून आपण या कालावधीत काय काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न आव्हाडांकडून सुरु आहे. तसेच बदलला पक्ष आणि त्याचे चिन्ह हे देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे या हेतून तशा आशायचे देखील फलक मुंब्रा, कळवा भागात लावण्यात आले आहेत. आता त्याचा किती परिणाम होणार हे आता येणाºया विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार