शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:00 IST

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी

जितेंद्र कालेकर, अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा वृक्ष पडले.तीन हजार नागरिकांचे स्थलांतरखबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे पालिकेनेही एनडीआरफची टीम तैनात ठेवली.खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.वादळाची कमी झालेली तीव्रता यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.आपत्ती व्यवस्थापन पथक तैनातठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके मीरा-भार्इंदर, शहापूर, नवी मुंबईत तैनात केली होती.सखल भागात पाणीकल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा भागातील नवशक्ती चाळीत पाणी साचले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. शहापूरातील दरिहगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचे नुकसान झाले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ