शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:00 IST

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी

जितेंद्र कालेकर, अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा वृक्ष पडले.तीन हजार नागरिकांचे स्थलांतरखबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे पालिकेनेही एनडीआरफची टीम तैनात ठेवली.खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.वादळाची कमी झालेली तीव्रता यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.आपत्ती व्यवस्थापन पथक तैनातठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके मीरा-भार्इंदर, शहापूर, नवी मुंबईत तैनात केली होती.सखल भागात पाणीकल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा भागातील नवशक्ती चाळीत पाणी साचले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. शहापूरातील दरिहगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचे नुकसान झाले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ