शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:00 IST

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी

जितेंद्र कालेकर, अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा वृक्ष पडले.तीन हजार नागरिकांचे स्थलांतरखबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे पालिकेनेही एनडीआरफची टीम तैनात ठेवली.खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.वादळाची कमी झालेली तीव्रता यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.आपत्ती व्यवस्थापन पथक तैनातठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके मीरा-भार्इंदर, शहापूर, नवी मुंबईत तैनात केली होती.सखल भागात पाणीकल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा भागातील नवशक्ती चाळीत पाणी साचले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. शहापूरातील दरिहगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचे नुकसान झाले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ