शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Thane: जगातील सर्वात उंच शिखरावर पोहचली ठाण्यातील ग्रिहिथा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 21, 2023 17:45 IST

Thane: महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ग्रिहिथा विचारे हिने भारताचा तिरंगा ह्याच माउंट किलीमांजारो वरून फडकवत भारताच नाव मोठे केले आहे.

ठाणे - वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आयुष्यातील एक मानाचा तुरा रोवला गेला तो मातृभूमीपासून दूर आणि जगातील सर्वात उंच एका शिखरावर ठाण्यातील ग्रिहिथा विचारे हिच्या शिरपेचात. ग्रिहिथाच्या दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ग्रिहिताच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन तिच्या या धाडसी मोहिमेचे कौतुक केले.

जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर आठवतो तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट. पण एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे. आणि जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटन म्हणून आहे तो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर इतकी आहे. ग्रिहिथा विचारे हिने हा ट्रेकिंग मरांगू गेट (१८७९ मीटर)-मंदारा हट (२७२० मीटर)-होरोम्बो हट (३७२० मीटर) किबो हट (४७२० मीटर) गिलमन्स (५६८५ मीटर) उहुरु शिखर मार्गे केला आहे.

महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ग्रिहिथा विचारे हिने भारताचा तिरंगा ह्याच माउंट किलीमांजारो वरून फडकवत भारताच नाव मोठे केले आहे. हा मार्ग ट्रेकर्सना क्लासिक किलीमांजारो गिर्यारोहणाचा अनुभव प्रदान करतो, उहुरु शिखराच्या शिखरापर्यंत सर्व मार्गाने विलोभनीय दृश्ये आणि एक अद्भुत हायकिंग साहस प्रदान करतो. ग्रिहिथाच्या ह्या उत्तुंग कामगिरीने आज ती जगाच्या सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारो वर भारतीय तिरंगा फडकवणारी सर्वात कमी वयाची म्हणजेच फक्त ९ वर्षांची भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. अजूनही कित्येक मानांकने ह्या चिमूकलीच्या नावे होणे बाकी आहे आणि त्याची आखणी देखील सुरू आहे. या उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ग्रिहिथाला सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

टॅग्स :thaneठाणे