शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ठाणेकरांना सुखद श्रावणसरींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:26 IST

जिल्ह्यात पावसाची सरासरी ९१.८३ : भिवंडीत १०५ टक्के पाऊस

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंगठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या. काही काळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऊन पडत असल्याचा अनुभव ठाणेकरांना मिळत आहे. यादरम्यान कल्याणच्या म्हारळगावात एक घर पडले, तर ठाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८७ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सरासरी ४१ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९१.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये साधारणपणे १५ हजार ७४९.३२ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी दोन हजार २४९.९० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १०४.७७ टक्के पडला असून याखालोखाल ठाणे शहर परिसरात ९७.४९ टक्के, तर कल्याणला ९२.३५, उल्हासनगरला ९५.७२, मुरबाडला ८०.४३, अंबरनाथला ८८.७० आणि ८३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे.ठाणे : रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरात दिवसभर जोरदार बॅटिंग केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर, वाढत्या पावसामुळे शहराच्या विविध भागांत त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात मागील आठ तासांत ४३.६९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानुसार, शहरात आतापर्यंत २२४४.८५ मिमी पाऊस शहरात झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २६७४.६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग केल्याचे दिसून आले. तर, दुपारी काही वेळ पावसाने उसंत घेतली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाने आपला रंग दाखवला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. शहरातील विविध भागांत कोसळणाºया पावसामुळे आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. तर, शहरात दिवसभरात सात ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. तर, दोन ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या होत्या. तर, पाच ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले होते. तर, एक ठिकाणी संरक्षक भिंत आणि अन्य एका ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. तर शहरातील नेहमीच्याच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मागील आठवड्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहर जलमय झाले होते.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी