शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ठाणेकरांना सुखद श्रावणसरींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:26 IST

जिल्ह्यात पावसाची सरासरी ९१.८३ : भिवंडीत १०५ टक्के पाऊस

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंगठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या. काही काळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऊन पडत असल्याचा अनुभव ठाणेकरांना मिळत आहे. यादरम्यान कल्याणच्या म्हारळगावात एक घर पडले, तर ठाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८७ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सरासरी ४१ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९१.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये साधारणपणे १५ हजार ७४९.३२ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी दोन हजार २४९.९० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १०४.७७ टक्के पडला असून याखालोखाल ठाणे शहर परिसरात ९७.४९ टक्के, तर कल्याणला ९२.३५, उल्हासनगरला ९५.७२, मुरबाडला ८०.४३, अंबरनाथला ८८.७० आणि ८३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे.ठाणे : रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरात दिवसभर जोरदार बॅटिंग केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर, वाढत्या पावसामुळे शहराच्या विविध भागांत त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात मागील आठ तासांत ४३.६९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानुसार, शहरात आतापर्यंत २२४४.८५ मिमी पाऊस शहरात झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २६७४.६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग केल्याचे दिसून आले. तर, दुपारी काही वेळ पावसाने उसंत घेतली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाने आपला रंग दाखवला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. शहरातील विविध भागांत कोसळणाºया पावसामुळे आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. तर, शहरात दिवसभरात सात ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. तर, दोन ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या होत्या. तर, पाच ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले होते. तर, एक ठिकाणी संरक्षक भिंत आणि अन्य एका ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. तर शहरातील नेहमीच्याच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मागील आठवड्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहर जलमय झाले होते.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी