शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यात फायनान्स कंपनीच्या वाहनांचा अपहार करुन परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:04 IST

ठाण्याच्या ‘साई पॉईन्ट’ या वाहनांसाठी कर्ज पुरवठा करणा-या कंपनीच्या थकबाकीदारांच्या दुचाकी परस्पर एका गोदामात ठेवून नंतर त्यांची विक्री करणा-या कंपनीचाच वसूली अधिकारी दीपक रावत आणि त्याचा साथीदार अजगर खान या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांची वाहने जप्त करुन केली विक्रीवसूली अधिकाऱ्याचा ‘प्रताप’नौपाडा पोलिसांची कामगिरी

ठाणे: वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणा-या ठाण्यातील एका वित्तीय संस्थेच्या थकबाकीदारांच्या वाहनांची परस्पर विक्री करणा-या दीपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांना नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली आहे.ठाण्याच्या पाचपाखाडीतील ‘साई पॉईन्ट’ या वाहनांना कर्ज पुरवठा करणा-या कंपनीतून बरीच वाहने बेपत्ता असल्याची तक्रार या कंपनीने नौपाडा पोलिसांकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती. याच कंपनीचा मुख्य वसूली अधिकारी म्हणून काम करणारा दिपकसिंग रावत यानेच अजगर खान या दलालाच्या मदतीने कर्ज थकबाकीदारांची वाहने परस्पर आणून ती कंपनीत न ठेवता आपल्याच गोदामात ठेवली. नंतर त्यांची त्याने विक्रीही केली. अशाच विक्री केलेल्या वाहनांपैकी एकाच्या मालकाने मोटारसायकलची आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी लागणारा ना हरकत दाखला (एनओसी) साई पॉर्इंट कंपनीकडे मागणी केला. परंतू, त्या दुचाकीच्या विक्रीची नोंदच या कंपनीत नव्हती. शिवाय, ती या कंपनीत उपलब्धही नव्हती. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापक जयप्रकाश तिवारी यांनी इतरही वाहनांची चौकशी केली. तेंव्हा अनेक वाहने बेपत्ता असल्याचे आढळले. तेंव्हा याप्रकरणी चौकशीचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात या कंपनीने केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार अहिरे आदींच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेंव्हा साई पॉर्इंटचा कर्मचारी रावत यानेच एका दलाला हाताशी धरुन अनेक वाहनांचा अपहार करुन त्यांची ५० हजार ते सव्वा लाखांच्या किंमतीमध्ये विक्री केल्याचे आढळले. हा प्रकार तिवारी आणि कंपनीच्या मालकाच्या परस्पर झाल्याने त्यांनाही या प्रकाराची माहिती नव्हती. ज्या दुचाकीच्या मालकांनी कर्ज थकीत केले आहे, त्यांची वाहने ताब्यात घेऊन ती कंपनीच्या काल्हेर, भिवंडीतील गोदामात जमा करण्याचे काम रावतकडे होते. ही वाहने जमा केल्यानंतर त्याची मेलद्वारे माहिती देण्याचे कामही त्याच्याकडे होते. याचाच फायदा घेऊन रावत याने अजगर या दलालाच्या मदतीने हप्ते न भरलेल्या मोटारसायकली उचलून त्याची कंपनीला कोणतीही माहिती न देता त्यांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या वाहनांची रक्कम कंपनीच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असतांनाही तिचा त्यांनी अपहार केला. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी ६ जुलै रोजी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच ७ जुलै रोजी दिपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी चोरी करुन परस्पर विक्री केलेल्या सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनाही सुरुवातीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी