शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

By सुरेश लोखंडे | Updated: January 25, 2024 22:00 IST

Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे.

ठाणे  - लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी  कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी  रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी,  बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा., असे सांगितले. तर  डाँ. ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणे