शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

By सुरेश लोखंडे | Updated: January 25, 2024 22:00 IST

Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे.

ठाणे  - लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी  कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी  रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी,  बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा., असे सांगितले. तर  डाँ. ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणे