शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

By सुरेश लोखंडे | Updated: January 25, 2024 22:00 IST

Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे.

ठाणे  - लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी  कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी  रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी,  बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा., असे सांगितले. तर  डाँ. ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणे