शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

By सुरेश लोखंडे | Updated: January 25, 2024 22:00 IST

Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे.

ठाणे  - लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी  कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी  रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी,  बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा., असे सांगितले. तर  डाँ. ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणे