शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Thane: 'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू'

By अजित मांडके | Updated: October 25, 2023 23:02 IST

Thane: धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

- अजित मांडके ठाणे :  धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. अशाप्रकारे जर आदिवासी समाजाचे आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आज आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.

आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. अत्यंत मागास आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आदिवासी समाजाच्या चाळीसहून अधिक संघटनांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली असून या समितीची पत्रकार परिषद  ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांच्यासह अध्यक्ष यशवंत मलये आणि सचिव विश्वनाथ किरकिरे यांनी देखील आदिवासी समाजाच्या पुढील मांडल्या. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावे याला मात्र आपला  विरोध असल्याचे आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केले.

नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्रे बनवून आदिवासी समाजाचे आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोप संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांनी केला. आत्तापर्यंत असे चुकीचे प्रमाणपत्र बनवून लाखो लोकांनी आदिवासींचे आरक्षण लाटले असून त्यांना बाहेर काढत मूळ आदिवासी युवकांना त्यांचा रोजगार द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. आदिवासी समाजासाठी सरकारतर्फे जाहीर केलेल्या निधी इतरत्र वळवला जातो याचा निषेध करत त्यांनी मंजूर झालेल्या सर्वच्या सर्व निधी आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरला जावा अशी मागणी केली. या प्रमुख मागण्यांसह इतरही अनेक मागण्या आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केलेल्या आहेत.

आमच्या मागण्यांची गंभीर दखल घेत शासनाने यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर ठाणे मुंबई सह इतर महानगरांना आदिवासी भागात असलेल्या धरणांतून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णतः बंद करण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला. यासोबतच आदिवासी भागातून जाणारे महामार्ग रोखून वाहतुकीचा चक्काजाम करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. सरकारने आमच्या मागण्या गंभीरतेने घ्याव्यात अन्यथा २७ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील साकेत मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट जनअक्रोश मोर्चा आदिवासींच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणthaneठाणे