शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Thane: 'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू'

By अजित मांडके | Updated: October 25, 2023 23:02 IST

Thane: धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

- अजित मांडके ठाणे :  धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. अशाप्रकारे जर आदिवासी समाजाचे आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आज आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.

आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. अत्यंत मागास आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आदिवासी समाजाच्या चाळीसहून अधिक संघटनांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली असून या समितीची पत्रकार परिषद  ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांच्यासह अध्यक्ष यशवंत मलये आणि सचिव विश्वनाथ किरकिरे यांनी देखील आदिवासी समाजाच्या पुढील मांडल्या. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावे याला मात्र आपला  विरोध असल्याचे आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केले.

नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्रे बनवून आदिवासी समाजाचे आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोप संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांनी केला. आत्तापर्यंत असे चुकीचे प्रमाणपत्र बनवून लाखो लोकांनी आदिवासींचे आरक्षण लाटले असून त्यांना बाहेर काढत मूळ आदिवासी युवकांना त्यांचा रोजगार द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. आदिवासी समाजासाठी सरकारतर्फे जाहीर केलेल्या निधी इतरत्र वळवला जातो याचा निषेध करत त्यांनी मंजूर झालेल्या सर्वच्या सर्व निधी आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरला जावा अशी मागणी केली. या प्रमुख मागण्यांसह इतरही अनेक मागण्या आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केलेल्या आहेत.

आमच्या मागण्यांची गंभीर दखल घेत शासनाने यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर ठाणे मुंबई सह इतर महानगरांना आदिवासी भागात असलेल्या धरणांतून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णतः बंद करण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला. यासोबतच आदिवासी भागातून जाणारे महामार्ग रोखून वाहतुकीचा चक्काजाम करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. सरकारने आमच्या मागण्या गंभीरतेने घ्याव्यात अन्यथा २७ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील साकेत मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट जनअक्रोश मोर्चा आदिवासींच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणthaneठाणे