शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

ठाणे जिल्ह्याचा 86.63% निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:36 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८४.६३ टक्के तर शहराचा निकाल ८५.८६ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यासह शहरातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९० हजार ४६१ विद्यार्थी बसले होते, पैकी ७६ हजार ५५६ विद्यार्थी पास झाले.दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेत मुलींचीच सरशी दिसून आली. ठाणे जिल्ह्यातून ४७ हजार ७०५ मुले तर ४२ हजार ७५६ मुली बसल्या होत्या. त्यातून ३८ हजार ४३० मुले तर ३८ हजार १२६ मुली पास झाल्या. जिल्ह्यातून ८०. ५६ टक्के मुले तर ८९. १७ टक्के मुली पास झाल्या आहेत. ठाणे शहरातही मुली अग्रेसर राहिल्या आहेत. शहरातून १८ हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार ८९४ विद्यार्थी पास झाले. यात पास झालेले विद्यार्थी ८००२ असून विद्याथीर्नी ७८९२ आहेत. शहरातून ८२. २७ टक्के मुले तर ८९.८५ टक्के मुली पास झाल्या आहेत.जिल्ह्यातून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७८४३ असून २४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३८ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी द्वितीय तर ५४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व्यावसायिक शिक्षण घेणारे ८१८ विद्यार्थी बसले होते. ज्यात ५० विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, २९२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३१९ विद्यार्थ्यांना द्वितीय तर ११ विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे. हे शिक्षण घेणारे एकूण ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.>वाणिज्य शाखेतून ४७ हजार ७१८ विद्यार्थी बसले होते पैकी ५२४५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. प्रथम श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १४ हजार २४४, द्वितीय श्रेणी मिळवलेले १८ हजार ७०० तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ३३५४ आहेत. वाणिज्य शाखेतून ४१ हजार ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल कला शाखेतून १५ हजार ५५३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी ४१९, प्रथम श्रेणी मिळवलेले २६०७, द्वितीय श्रेणी मिळवलेले ७१३१ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी १३१६ आहेत. कला शाखेतून ११ हजार ४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल>विज्ञान शाखेतून २६ हजार ३७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या पैकी २१२९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, प्रथम श्रेणी मिळविलेले विद्यार्थी ७५५७, द्वितीय श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १२ हजार ३८४ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ७९८ आहेत. विज्ञान शाखेतून २२ हजार ८६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 86.71% लागला आहे.बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदा पुन्हा मुलींनी बाजी मारली. त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोषात मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व मैत्रिणींना घसघशीत मार्क मिळाल्यानंतरचा हा उत्साह.