शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

ठाणे जिल्ह्याचा 86.63% निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:36 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८४.६३ टक्के तर शहराचा निकाल ८५.८६ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यासह शहरातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९० हजार ४६१ विद्यार्थी बसले होते, पैकी ७६ हजार ५५६ विद्यार्थी पास झाले.दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेत मुलींचीच सरशी दिसून आली. ठाणे जिल्ह्यातून ४७ हजार ७०५ मुले तर ४२ हजार ७५६ मुली बसल्या होत्या. त्यातून ३८ हजार ४३० मुले तर ३८ हजार १२६ मुली पास झाल्या. जिल्ह्यातून ८०. ५६ टक्के मुले तर ८९. १७ टक्के मुली पास झाल्या आहेत. ठाणे शहरातही मुली अग्रेसर राहिल्या आहेत. शहरातून १८ हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार ८९४ विद्यार्थी पास झाले. यात पास झालेले विद्यार्थी ८००२ असून विद्याथीर्नी ७८९२ आहेत. शहरातून ८२. २७ टक्के मुले तर ८९.८५ टक्के मुली पास झाल्या आहेत.जिल्ह्यातून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७८४३ असून २४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३८ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी द्वितीय तर ५४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व्यावसायिक शिक्षण घेणारे ८१८ विद्यार्थी बसले होते. ज्यात ५० विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, २९२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३१९ विद्यार्थ्यांना द्वितीय तर ११ विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे. हे शिक्षण घेणारे एकूण ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.>वाणिज्य शाखेतून ४७ हजार ७१८ विद्यार्थी बसले होते पैकी ५२४५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. प्रथम श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १४ हजार २४४, द्वितीय श्रेणी मिळवलेले १८ हजार ७०० तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ३३५४ आहेत. वाणिज्य शाखेतून ४१ हजार ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल कला शाखेतून १५ हजार ५५३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी ४१९, प्रथम श्रेणी मिळवलेले २६०७, द्वितीय श्रेणी मिळवलेले ७१३१ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी १३१६ आहेत. कला शाखेतून ११ हजार ४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल>विज्ञान शाखेतून २६ हजार ३७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या पैकी २१२९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, प्रथम श्रेणी मिळविलेले विद्यार्थी ७५५७, द्वितीय श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १२ हजार ३८४ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ७९८ आहेत. विज्ञान शाखेतून २२ हजार ८६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 86.71% लागला आहे.बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदा पुन्हा मुलींनी बाजी मारली. त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोषात मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व मैत्रिणींना घसघशीत मार्क मिळाल्यानंतरचा हा उत्साह.